Mokhada News: आंबा, काजूच्या पिकांच्या आर्थिक आधाराची खरीप हंगामानंतर शेतकरी, फळबागयतदारांना अपेक्षा असते. मात्र, सातत्याने ढगाळ वातावणामुळे मोहर गळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे फळबागयतदारांसमोर पुन्हा अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. .मोखाड्यात खरीप हंगामाचे पीक उत्पन्नाचे एकमेव साधन आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्नासाठी आंबा, काजूची लागवड केली आहे. खरिपाचे उत्पन्न पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असते..Weather Impact : प्रतिकूल हवामानामुळे द्राक्ष बागांवर कुऱ्हाड.अशातच यंदा पावसाळा लांबल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाकडून नुकसानीची काहीअंशी मदत मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे..Weather Impact : पावसाचा उडीद, मुग पिकास फटका.तर आंबा, काजूमुळे उत्पन्न मिळण्याची आस लागली आहे. मात्र, ढगाळ वातावरणाने मोहोर गळून जाण्याची भीतीने शेतकरी, फळबागायतदार धास्तावले असून वातावरणातील बदलांमुळे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे..पीक शेतकरी संख्या लागवड क्षेत्रआंबा २ हजार १६० ५५९ : ५० हेक्टरकाजू २ हजार ३६ ४५१ : ४० हेक्टर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.