Jalgaon News: खानदेशात यंदा थंडी बऱ्यापैकी असतानाच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हिवाळ्याच्या शेवटच्या कालावधीत ढगाळ व विषम वातावरण कायम असून, रब्बी उत्पादनवाढीसही यामुळे फटका बसू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..नोव्हेंबरमध्येही अनेक दिवस ढगाळ वातावरण होते. पाऊसही दिवाळीच्या कालावधीत झाला. डिसेंबरमध्ये अनेक दिवस नीरभ्र वातावरण होते. पण आता काही दिवसांपूर्वी अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले. थंडी कमी झाली. ढगाळ वातावरणासह राज्यात काही भागांत पाऊसही झाला. यामुळे शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. सध्या किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत आहे..Climate Change Impact: थंडीत अवकाळीचा तडाखा.रोगराईची भीतीकेळी, भाजीपाला पिकांत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती होती. अशात शेतकऱ्यांनी फवारण्या घेतल्या. हरभरा, दादर ज्वारी आदी पिकांच्या वाढीसही फटका बसू शकतो. सध्या निरभ्र, कोरड्या वातावरणाची गरज रब्बी पिकांना आहे. परंतु पावसाळी वातावरण तयार झाल्यास आणखी अडचणी येतील. सध्या केळी, पपई पिकात काढणी सुरू आहे. केळी लागवडदेखील सुरू आहे. काढणी, खरेदीची कार्यवाही शिवारात होत असल्याने त्यासाठी कोरड्या व निरभ्र वातावरणाची गरज आहे. पावसाळी, ढगाळ वातावरणामुळे खरेदीदार खरेदी, काढणीची प्रक्रिया लांबणीवर टाकतात. यामुळे शेतकऱ्यांना काढणीची प्रतीक्षा करावी लागते..कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीत दाणे पक्व होत आहेत. त्यात काही शेतकऱ्यांनी सिंचनाचे नियोजन केले होते. परंतु अशातच पाऊस आल्यास मोठी हानी होईल, अशी भीती असल्याने सिंचनाचे नियोजन शेतकऱ्यांनी लांबणीवर टाकले आहे. दोन दिवसांपासून दुपारी उकाडा, उष्णता व रात्री थंड वातावरण तयार होत आहे. पहाटेची थंडी आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, हे तापमान १६ अंश सेल्सिअसवरपर्यंत पोहोचले आहे..Climate Change Impact: कमीअधिक थंडीसह पावसाच्या अंदाजानुसार करावयाचे व्यवस्थापन.जानेवारी म्हणजे गुलाबी थंडीचा, शेतात भरीत पार्ट्यांना अनुकूल मानला जातो. थंडी याच काळात वाढत जाते. परंतु हुडहुडी भरविणारी थंडी या महिन्यात नाही. कमाल तापमानात काहीशी वाढ झाली आहे. विविध हवामान अभ्यासकांनी थंडीवर परिणाम होईल, असे भाकीत केले. यामुळे शेतकऱ्यांनी केळीचे सिंचन वाढविण्याचा विचार केला. कारण उष्णता वाढली आहे. थंडीच्या काळात केळी पिकाचे सिंचन रात्री केले जाते. परंतु या नियोजनात अनेक उत्पादकांनी बदल केला आहे. तसेच लहान केळी पिकात बुरशीजन्य रोगांची समस्या दूर करण्यासाठी शेतकरी फवारण्या घेत आहेत..शेतकऱ्यांचा काढणीवर भरखराब रस्ते, अडचणीच्या भागातील रस्त्यांलगतच्या शेतकऱ्यांनी मात्र केळी, पपई काढणीवर भर दिला. कारण या भागात पाऊसदेखील झाल्यास वाहने शेतापर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे काही शेतकऱ्यांना कमी पक्व शेतीमालही काढणी करून खरेदीदारांना द्यावा लागत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.