Cloudy Weather : हिवाळ्यात अनेक दिवस ढगाळ वातावरण

Weather Update : खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण हिवाळ्यात अनेक दिवस होते. दर महिन्याला ढगाळ वातावरण तयार झाले. याचा परिणाम रब्बी पिकांवरही झाला आहे.
Cloudy Weather
Cloudy WeatherAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण हिवाळ्यात अनेक दिवस होते. दर महिन्याला ढगाळ वातावरण तयार झाले. याचा परिणाम रब्बी पिकांवरही झाला आहे. मागील महिन्यात तब्बल १२ दिवस ढगाळ वातावरण होते. त्यापूर्वी नोव्हेंबर अखेरीस व डिसेंबर महिन्यात पावसाळी वातावरण होते.

गेल्या दीड महिन्यात फक्त १५ ते २० दिवस निरभ्र, कोरडे वातावरण राहीले. यामुळे रब्बी पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस तीन दिवस निरभ्र वातावरण होते. नंतर या महिन्याच्या सुरवातीला ढगाळ वातावरण होते. इतर दिवस ढगाळ, अंशतः ढगाळ वातावरण राहीले आहे.

स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणाची गरज रब्बीला आहे. यातच या महिन्यात मंगळवारी (ता.४) निरभ्र वातावरण तयार झाले आहे. यामुळे कांदा, वेचणीला गती आली. थंडीच आगमनही पुन्हा झाले आहे. रब्बीच्या जोमदार वाढीसाठी निरभ्र, कोरड्या वातावरणाची पिकांना गरज आहे.

Cloudy Weather
Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढला; शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेण्याचा सल्ला

गेल्या नोव्हेंबरमध्ये खानदेशात अनेक भागांत ढगाळ वातावरण होते. यानंतर ढगाळ व पावसाळी वातावरण अनेक दिवस कायम होते. चांगली किंवा हुडहुडी भरविणार थंडी काही दिवस होती. जळगावमध्ये चोपडा, धरणगाव, जळगाव, एरंडोल, पाचोरा आदी भागात मध्यम पाऊस झाला.

Cloudy Weather
Weather Update Maharashtra : राज्यात उन्हाचा चटका वाढला; अनेक ठिकाणी पारा ३५ अंशावर 

२९ नोव्हेंबरला दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. यानंतर ८ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण होते. सोमवारी निरभ्र वातावरण होते. यानंतर थंडीचे आगमन झाले. ढगाळ वातावरणामुळे कापसाची खेडा खरेदीदेखील थांबली होती. कारण ही खरेदी उघड्यावर केली जाते. कापूस ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जाते. यासाठी कोरडे वातावरण हवे असते. कांदा पिकाचेदेखील अंशतः नुकसान ढगाळ वातावरणात झाले आहे.

अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढणीवर आहे. रब्बी पिकांची पेरणी कशीबशी शेतकऱ्यांनी उरकली. पण ही पिके विषम वातावरणामुळे संकटात होती. त्यात डिसेंबरमध्ये २५ ते २९ या तारखांना पाऊस व गारपीटही काही भागात झाली. कांदा रोपवाटिकांची हानी झाली. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ढगाळ वातावरणात बुरशीजन्य रोग सक्रिय होऊन पुढे भाजीपाला, केळी पिकात नुकसान झाले आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com