Mumbai News: डहाणू, पालघर, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या तालुक्यांत आंबा उत्पादन घेतले जाते. पण हवामान बदल, अवकाळी पावसाने आंबा पिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे पिकाच्या संरक्षणासाठी वेळीच औषध फवारणीचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. .मोहोर येण्यापासून फळ काढणीपर्यंत तुडतुडे, फुलकिडी, भुरी रोग, फळमाशी तसेच फळगळ अशा विविध समस्या उद्भवतात. योग्य वेळी काळजी घेतल्यास नुकसान कमी होऊन उत्पादनात वाढ होते. पावसाळ्यानंतर मुळांना पाण्याचा ताण, त्यानंतर १०-१५ दिवस १२-१५°से. पेक्षा कमी तापमान राहिल्यास पालवीवर मोहोर येतो..Grape Crop Protection: सद्यःस्थितीत भुरी नियंत्रणासाठी उपाय.मात्र या काळात फुलकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मध्यम तापमान, आर्द्रतेत वाढल्यामुळे पिकावर तुडतुडे, भुरी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजनांचे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ. उत्तम सहाणे यांनी केले आहे..नियंत्रण गरजेचेआंबा परपरागीभवनाचे पीक असून मधमाश्या परागीभवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मोहोर फुलण्यापासून फळ धारणेपर्यंत (२० ते २५ दिवस) रासायनिक कीटकनाशके टाळावीत. बागेत मधमाशीच्या पेट्या ठेवाव्यात..Crop Protection: अन्न, पोषण सुरक्षितेसाठी पीक संरक्षण महत्त्वाचे .फळवाढीच्या अवस्थेत फळमाशी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. किडीमुळे सुमारे ३० ते ४० टक्के नुकसान होते. नियंत्रणासाठी जानेवारीपासून बागेत मिथाईल यूजेनॉलयुक्त फळमाशी सापळे चार लावावेत..आंबा फळपीक एकदाच येते. या फळाचे संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याने कीड, रोग केव्हा येतात, त्यांची लक्षणे काय आहेत, हे समजून घेणे गरजेचे आहे.- डॉ. उत्तम सहाणे, तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.