Jalna News : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४-२५ मधील सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून किंवा इतर अन्य कारणाने नुकसान झालेल्या तालुक्यातील जवळपास ८३ हजार अठरा शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारी नोंदवत विमा मिळवण्याचे दावे दाखल केले आहे. हे दावे मंजूर होऊन कधी पैसे खात्यावर जमा होतात याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
गेली काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका पिकांना बसत आहे. पिकांना संरक्षण मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने पीकविमा योजना सुरू केली. गेली काही वर्षांपासून हेक्टरी रकमेची अट शिथिल करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. त्यात गेली दोन वर्षांपासून राज्य शासनाने केवळ एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली.
त्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पीकविमा योजनेची कामे जिल्ह्यानिहाय इन्शुरन्स कंपन्यांना देण्यात आली आहेत. जालना जिल्ह्याचे काम युनिव्हर्सल शाम्पू जनरल इन्शुरन्स कंपनीकडे सोपविण्यात आले. एक रुपयांत पीकविमा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून पीकविमा संरक्षित केला.
त्यानुसार घनसावंगी तालुक्यातील ५७,३३७ शेतकऱ्यांनी ७५ हजार ८४५ हेक्टर क्षेत्रावरील पीक संरक्षित केले. नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास भरपाई मिळवण्यासाठी विमा कंपनीला ७२ तासाच्या आत विमा कंपनीच्या ॲपवर ऑनलाइन तक्रार करणे बंधनकारक आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी यंदा ८३ हजार १८ तक्रारी दाखल करून विमा कंपनीकडे दावे दाखल केले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.