
Amaravati News : संपूर्ण चिखलदरा तालुक्याला पाणीटंचाईने डबघाईस आणले आहे. पाणीटंचाईच्याच नावावर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग लाखो रुपयांची कामे निकृष्ट दर्जाची करून आपली पोळी शेकत आहे. या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा पुरावा चिखलदरा तालुक्यातील मडकी गावात बघायला मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २२ लाख रुपये खर्च करून पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले. मात्र, टाकीला खालून व आतून भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे यात पाण्याचा थेंबसुद्धा थांबत नसल्याने गावकऱ्यांना गावाशेजारी असणाऱ्या विहिरीवरून पाणी भरण्याची कसरत करावी लागत आहे. चिखलदरा तालुक्यातील मडकी या गावात विहिरीला चांगले पाणी आहे.
या विहिरीचे अंतर गावापासून एक किलोमीटर असून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन विहीर पाइपलाइन व पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले, पण एवढा रुपये खर्च करूनसुद्धा या योजनेचा गावकऱ्यांना कुठलाच फायदा होत नाही.
गावातील महिला व पुरुषांना एक किलोमीटरवर असलेल्या विहिरीवरूनच डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ ग्रामीण पाणीपुरवठा विभागानेच आणली आहे. त्यामुळे आजही परिस्थिती जैसे थेच आहे. आता येथील पाण्याची टाकी कोरडी पडली आहे. टाकीच्या आतील भागात भेगा तर खालून मोठ्या प्रमाणात गळती आहे.
मेळघाटात बऱ्याच गावांत पाण्याच्या टाक्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामीण पाणीपुरवठा विभागच संशयाच्या भोवऱ्यात आला असून, या विभागाचीच चौकशी करणे अनिवार्य झाले असल्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.