BRS Party Office: चंद्रशेखरराव यांच्या बीएसआरचं पहिलं कार्यालय नागपूरात; देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात बीएसआरची एंट्री

Bharat Rashtra Samiti : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षानं मिशन महाराष्ट्रची जय्यत तयारी सुरू केलीय. मराठवाड्यात सभांची राळ उडवल्यानंतर आता विदर्भातील नागपूर येथे बीआरएसचं पहिलं पक्ष कार्यालय उभारण्यात येतंय.
KCR
KCRAgrowon

Chandrasekhar Rao News : तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षानं मिशन महाराष्ट्रची जय्यत तयारी सुरू केलीय. मराठवाड्यात सभांची राळ उडवल्यानंतर आता विदर्भातील नागपूर येथे बीआरएसचं पहिलं पक्ष कार्यालय उभारण्यात येतंय.

या कार्यालयाचं उद्घाटन तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष चंद्रशेखर राव यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १५) करण्यात येणार आहे. वर्धा रोडवरील साई मंदिराजवळ बीआरएसने कार्यालय राज्यातील पहिलं पक्ष कार्यालय दिमाखात उभारलंय.

पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनानंतर चंद्रशेखर राव पक्ष कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत. यापूर्वी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात जंगी सभा घेत कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना शह देण्याचा प्रयत्न चंद्रशेखरराव यांनी केला.

तर विदर्भातील नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्यात चंद्रशेखर राव यांनी धडक मारत पक्ष कार्यालय उभारलंय.

KCR
K. Chandrshekhar Rao : ‘बीआरएस’ महाराष्ट्रात करणार पक्ष विस्तार

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समोर ठेवून चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात एंट्री मारली. त्यानंतर बीआरएसनं हळूहळू मराठवाडा, विदर्भ, खानदेश मार्गे पुणे जिल्ह्यापर्यंत बॅनरबाजी करून मजल मारलीय. राज्यातील शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज आणि पाणी देऊ, दरवर्षी १० हजार रुपये अशा लोकप्रिय घोषणांच्या जोरावर बीआरएसची घौडदौड सुरू आहे.

मराठवाडा विदर्भातील अनेक नेत्यांनी बीएसआरचा रुमाल गळ्यात घेऊन मैदानात उडी घेतलीय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बीआरएस निवडणूक लढवण्याचे संकेत खुद्द चंद्रशेखर राव यांनी संभाजी नगर येथील सभेत दिलेत. त्यामुळे या सभेनंतर बीआरएसचा पक्षप्रचार जोरात सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

देवेंद्र फडणवीस यांना टक्कर

मराठवाड्यातील नांदेड येथे चंद्रशेखरराव यांनी सभा घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज आणि पाणी देण्याचं खुलं आव्हान दिलं होतं. महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांना मोफत पाणी आणि वीज पुरवली तर बीएसआर महाराष्ट्रात पाऊल ठेवणार नाही, असंही म्हंटलं होतं.

त्यानंतर मात्र फडणवीस यांनी राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पीएम किसानच्या धर्तीवर वर्षाला ६ हजार रुपये देणारी नमो महासन्मान योजना राज्यात लागू करण्याची घोषणा केली. त्यामुळे बीएसआरचा फडणवीसांनी धसका घेतल्याचं बोललं जातं आहे.

आता तर बीआरएसनं फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपुरातचं पक्षाचं पहिलं कार्यालय उभारून टक्कर देण्याचे मनसुबे स्पष्ट केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com