Yavatmal News : खरीप आणि रब्बी हंगामात अतिवृष्टी, गारपिटीने दुबार तिबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली. या तूलनेत मात्र उत्पादन झाले नाही, त्यातच शेतीमालाला भाव नाही.
परिणामी लागवडीचा खर्च ही निघाला नसून उलट शेतकरी कर्जबाजारी झाल्याने खरीप हंगामाकरिता पैसा उभा करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाले आहे.
मागील वर्षी पावसाने थैमान घातल्याने अतिवृष्टीसह गारपिटीने शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. यामुळे कपाशी, तूर, सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच कपाशी, तूर पिकांना योग्य भाव मिळाला नाही.
सोयाबीन, हरभरा, गहू पिकांचे उत्पादन घटले. या पिकांनाही यौग्य भाव मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघाला नाही. उलट शेतकऱ्यांवरच कर्जाचा डोंगर झाला.
उन्हाळी पिकाच्या लागवडीतून ही तूट भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्यातूनच मग शेतकऱ्यांनी तीळ, ज्वारी, गहू, भुईमूग लागवड केली. परंतु त्यालाही अवकाळी पाऊस गारपिटीचा फटका बसला त्याचाही परिणाम उत्पादकतेवर झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.