२०२५-२६ हंगामात १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगीमोलॅसिसवरील ५० टक्के निर्यात शुल्कही हटवलेकेंद्राने निश्चित केलेला निर्यात कोटा हा साखर उद्योगाने मागणी केलेल्या २० लाख टनांपेक्षा कमी.Sugar Exports: ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या २०२५-२६ हंगामात केंद्र सरकारने १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. केंद्रीय अन्न मंत्रालयाने मोलॅसिसवरील ५० टक्के निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी ७ नोव्हेंबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्रातून दिली आहे..देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने जी काही पावले उचलली आहेत; याची माहिती देत असताना, साखर निर्यातीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आला आहे..Sugar Export : साखर उत्पादन वाढण्याची शक्यता; निर्यात कोटा २० लाख टनांपर्यंत वाढवा, उद्योगाची मागणी ."चालू साखर हंगामात केंद्र सरकारने १५ लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोलॅसिसवरील ५० टक्के निर्यात शुल्क हटविण्यात आले आहे," असे जोशी म्हणाले..Sugar Industry: साखर उद्योगाकडे ‘जीडीपी’चा तीन टक्के वाटा उचलण्याची क्षमता .यंदा देशात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. यामुळे निर्यात कोटा २० लाख टनांपर्यंत वाढवावा, अशी साखर उद्योगाची मागणी आहे. पण केंद्राने यंदाच्या हंगामात निश्चित केलेला निर्यात कोटा हा साखर उद्योगाने मागणी केलेल्या २० लाख टनांपेक्षा कमी आहे..गेल्या हंगामात १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. पण सप्टेंबरमध्ये संपलेल्या २०२४-२५ च्या हंगामात सुमारे ८ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. .इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर अपेक्षेपेक्षा कमी झाला. यामुळे देशात साखरेचा अतिरिक्त साठा असून केंद्राचा साखर निर्यातीला परवानगी देण्याचा विचार असल्याचे संकेत अन्न विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी अलीकडेच दिले होते. .२०२४-२५ मधील हंगामात साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी केवळ ३४ लाख टन साखर वळवली. जी अपेक्षित असलेल्या सुमारे ४५ लाख टनांपेक्षा खूपच कमी होती. यामुळे चालू हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात साखरेचा साठा शिल्लक राहिला, असे त्यांनी नमूद केले..इथेनॉलसाठी ४५ लाख ते ५० लाख टन साखरेचा वापर होईल, अशी शक्यता याआधी साखर उद्योगाने व्यक्त केली होती. पण जैवइंधनासाठी एकूण वाटपाच्या केवळ २८ टक्केचा वापर इथेनॉलसाठी करण्यात आला. उर्वरित वापर खाद्यावर आधारित इथेनॉल प्लांटसाठी करण्यात आला..चालू हंगामात साखरेचे उत्पादन ३४३.५ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर वर्षभरात देशांतर्गत मागणी २८५ लाख टन राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.