Water Shortage : खानदेशचा मध्यभाग, गिरणा पट्ट्यात अनेक प्रकल्प कोरडे

Water Crisis : खानदेशात यंदा जून, ऑगस्टमध्ये पाऊसमान अल्प होते. परिणामी, अनेक सिंचन प्रकल्प, लघू प्रकल्पांत कमी जलसाठा आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात यंदा जून, ऑगस्टमध्ये पाऊसमान अल्प होते. परिणामी, अनेक सिंचन प्रकल्प, लघू प्रकल्पांत कमी जलसाठा आहे. काही प्रकल्पांतील साठा मृत स्थितीत पोहोचला आहे. यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यांतच टंचाई स्थिती तयार होऊ शकते. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करण्याची गरज आहे.

गिरणा पट्टा म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागांतील कुठलाही सिंचन प्रकल्प १०० टक्के भरलेला नाही. चाळीसगावमधील मन्याड प्रकल्प दुसऱ्यांदा मृतसाठा स्थितीत पोहोचला आहे.

मागील तीन वर्षे मन्याड प्रकल्पातील जलसाठा १०० टक्के होता. परंतु यंदा मन्याडसह पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती, भोकरबारी, एरंडोलातील अंजनी या प्रकल्पांतील साठाही अल्प आहे. अंजनीतील जलसाठा काहीसा वाढला. काही नदी नालेही प्रवाहित झाले. परंतु सिंचन प्रकल्प १०० टक्के भरलेच नाहीत.

Water Crisis
Water Fodder Shortage : चारा-पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची शेतकऱ्यांची तयारी

चाळीसगावनजीकच्या गिरणा नदीवरील गिरणा धरणातील जलसाठाही फक्त ५७ टक्केच आहे. यातून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव तालुक्यांना लाभ होतो. शहरांचा पाणीपुरवठादेखील त्यावर अवलंबून आहे. परंतु या प्रकल्पातील कमी जलसाठा शेतकरी, शहरांमधील नागरिकांची चिंता वाढविणारा आहे.

Water Crisis
Water Shortage : धुळ्यातील सातपुडा भागात पाणीटंचाई जाणविणार

धुळ्यातील मालनगाव, अमरावती, सोनवद, बुराई या प्रकल्पांतही जलसाठा कमी आहे. बुराई प्रकल्पाने तळ गाठला आहे. तसेच जिल्ह्यातील सुमारे १९ लघू प्रकल्प, तलावही कोरडेच आहेत. धुळे, शिंदखेडा, साक्रीचा उत्तर भाग टंचाईचा सामना करील, असे चित्र आहे.

नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार तालुक्यांतील कमाल सिंचन प्रकल्प कोरडे आहेत. फक्त दरा व देहली प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे. परंतु इतर २५ लघू व मध्यम प्रकल्पांत जलसाठा कमी असल्याने यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यांतच टंचाई स्थिती तयार होऊ शकते, असे दिसत आहे.

पाण्याची स्थिती असमाधानकारक

खानदेशात मागील वर्षी ८० टक्के प्रकल्प १०० टक्के भरले होते. यंदा जुलै व सप्टेंबरमध्ये पाऊस बरा होता. पण त्याचे स्वरूप जोरदार नसल्याने जलसाठा वाढला नाही. खानदेशातील निम्मेही प्रकल्प १०० टक्के स्थितीत नाहीत.

टंचाई स्थितीबाबत प्रशासनाला पुढील महिन्यातच कार्यवाही करावी लागेल, असे चित्र आहे. फक्त सातपुडा पर्वतालगतचे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. इतरत्र स्थिती समाधानकारक नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com