Mumbai News: मराठवाड्यासह राज्यात अन्यत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आज (ता. ३०) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी तयारी म्हणून प्रशासनाच्या बैठकांचे सत्र मंत्रालयात सोमवारी सुरू होते.मात्र, याबाबत कृषी, मदत व पुनर्वसन विभाग आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव तयार नसल्याचे सांगितले..मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर गेले आठवडाभर सर्वच मंत्र्यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले. बहुतांश मंत्र्यांनी अतिवृष्टिग्रस्त भागात सर्वच पिके नष्ट झाल्याने सरसकट मदत केली जावी, असा आग्रह धरला आहे. मात्र, त्याबाबतच्या निर्णयाचा सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे घेणार आहेत. त्यामुळे कोणत्याही विभागाला याबाबत अधिकृत माहिती नाही..Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत आठ निर्णय; अतिवृष्टीग्रस्तांना २ हजार २१५ कोटींचा निधी आत्तापर्यंत मंजूर.राज्यात आजपर्यंत सरकारी यंत्रणेने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात केलेल्या पंचनाम्यांनुसार ४० लाख ४९ हजार ९१८ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झालेल्या सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि अन्य जिल्ह्यांमधील शेतीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे..Farmer Aid: ‘पीएम केअर’मधून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी द्या : ठाकरे.मागील मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी बहुतांश मंत्री करत होते. मात्र, नुकसानीचा आढावा घेऊ, बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ, त्यानंतर मदतीबाबत निर्णय घेऊ, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्वच मंत्र्यांनी बाधित क्षेत्राचा दौरा करून आढावा घेतला. परभणी, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड यांसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराने पिके वाहून गेली आहेत. या बाधितांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. जनावरांचा चारा, जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा पुरवठा प्रशासन करत आहे. तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांकडूनही पुरवठा केला जात आहे..मात्र, या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे अंतिम झाल्यानंतर या आठवड्यात प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडून सांगण्यात आले..बैठकांचे सत्रबाधितांना मदत देण्याबाबत मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची मुख्य सचिव राजेश कुमार यांनी बैठका घेतल्या. यामध्ये मदत देण्याबाबत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. दिवसभरात बैठकांचे सत्र सुरू होते..ॲग्रीस्टॅकचा पर्यायशेतकऱ्यांना मदत थेट खात्यात देण्याबाबत चर्चा झाली आहे. ही मदत ॲग्रीस्टॅकअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा पर्याय प्रशासनासमोर आहे. मात्र, बाधित जिल्ह्यांमध्ये कितपत नोंदणी झाली आहे, याचा आढावा घेतला जात आहे. राज्यातील १ कोटी ७१ लाख खातेदारांपैकी १ कोटी १७ लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.