Soybean Farmer Guarantee : शेतकऱ्यांचे सगळे सोयाबीन खरेदी करा अन्यथा...; काँग्रेस नेत्यांकडून आंदोलनाचा इशारा

Farmers Protest : शेतकऱ्यांकडे जितका सोयाबीन आहे तो खरेदी करावा. सरकारने सोयाबीन शेतकऱ्यानं दिलासा दिला नाही तर यवतमाळ इथे शेतकऱ्यांबरोबर आंदोलन करू असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
Soybean Farmer Guarantee
Soybean Farmer Guaranteeagrowon
Published on
Updated on

Maharashtra Politics : सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस आहे. बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही, त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडून सोयाबीन खरेदीचा कोटा वाढवून घ्यावा, शेतकऱ्यांकडे जितका सोयाबीन आहे तो खरेदी करावा. सरकारने सोयाबीन शेतकऱ्यानं दिलासा दिला नाही तर यवतमाळ इथे शेतकऱ्यांबरोबर आंदोलन करू आणि सगळा सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठेवू. असा इशारा काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी दिला. नागपूर येथे गुरूवारी(ता.०६) पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. हजारो टन सोयाबीन शिल्लक असताना सरकार मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष देत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. "महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी ही योजना आणली होती. पण आता लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून ही योजना बंद करणार असल्याची चर्चा आहे. गरजू आणि गरीब जनतेसाठी असलेली ही योजना बंद करू नये". अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Soybean Farmer Guarantee
Sugarcane Crushed Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ९८ लाख ३६ हजार टन उसाचे गाळप, साखर ११ टक्क्यांहून अधिक

"शिवभोजन थाळी या योजनेमुळे सामान्य जनतेला दहा रुपयात चांगले अन्न मिळते. लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीवर एकीकडे सरकार पैसे उधळते आणि गरीब जनतेसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना सुरू ठेवली पाहिजे". असेही वडेट्टीवार म्हणाले.

"राज्य सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागाचे मंत्री असताना त्यांच्या खात्यात घोटाळे झाले, त्यावेळी आयुक्तांची आणि सचिवांची बदली झाली होती. आता देखील विविध आरोप होत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकार का घेत नाही, इतकी या सरकारची काय मजबुरी आहे" असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. महायुती सरकारची इभ्रत वाचवायची असेल तर मुंडे यांचा राजीनामा घ्यावा असे वडेट्टीवार म्हणाले.

विदर्भ, मराठवाड्यातील लाखो क्विंटल सोयाबीन पडून

"राज्यातील विशेषकरून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. परंतु या कालावधीत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन खरेदी होणार नाही, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करेपर्यंत ही खरेदी केंद्रे सुरु ठेवावीत वेळप्रसंगी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी". अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com