

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुपारी पिकामध्ये मोठी फळगळ सुरू झाली आहे. अचानक वाढलेल्या फळगळीने सुपारी उत्पादकांची चिंता वाढली आहे. दरम्यान २१ ते २७ मे या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसाचा हा परिणाम मानला जात आहे.
जिल्ह्यात मेच्या पहिल्या आठवड्यापासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला. २१ मे २७ मे या कालावधीत सतत मुसळधार पाऊस राहिला. यामुळे कोकणातील सर्वच फळपिकांवर परिणाम झाला. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात सुपारी पिकांमध्ये लक्षणीय फळगळ दिसून येऊ लागली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोवळी फळे गळून पडत असल्याने मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ या तालुक्यांमध्ये सुपारी लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. सततच्या पावसामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊन ही फळगळ होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.