Union Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांची मोठी निराशा ; किसान सभेची टीका

Agriculture Budget : अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्याही नव्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
Agriculture Budget
Agriculture BudgetAgrowon

Pune News : अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पावर किसान सभेने टीका केली आहे. अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्याही नव्या उपाययोजना नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची टीका डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

नवले म्हणाले की, कृषी क्षेत्राचा विकासदर ४ टक्क्यांवरून घसरून १.८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राची घसरण थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा होती. मात्र, अशा कोणत्याही नव्या उपाययोजना अर्थसंकल्पात करण्यात न आल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.

सरकारच्या आर्थिक धोरणामुळे देशभर कृषी संकट अधिक गडद होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या जोडीला शेतमजूर व ग्रामीण बेरोजगार तरुणांच्या आत्महत्यांमध्येही गेल्या काळात मोठी वाढ झाली आहे. सरकारच्या आर्थिक धोरणामुळे व सातत्याच्या उपेक्षेमुळे ग्रामीण बकालता वाढीस लागल्याचेही नवले म्हणाले.

Agriculture Budget
Union Budget 2024 : देशातील २५ कोटी लोकं दारिद्र्य रेषे बाहेर - अर्थमंत्री सितारामण

दरम्यान, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि शेती क्षेत्राची होणारी पीछेहाट थांबवण्याची मोठी संधी नरेंद्र मोदी सरकारला होती. मात्र, अर्थसंकल्पात कोणतेही नवे धोरण, नवा दृष्टिकोन व नव्या उपाययोजना स्वीकारण्यात न आल्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने ही संधी हातची घालवल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

अंतरिम अर्थसंकल्पातून अपेक्षाभंग

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. मतदारांना खुश करण्यासाठी तरी चांगल्या घोषणा सरकारच्यावतीने होतील, असे सांगितले जात होते. मात्र, अर्थसंकल्पातून तसे झाल्याचे दिसत नाही.

Agriculture Budget
Union Budget 2024 : पंतप्रधान आवास योजनेतून २ कोटी घरं बांधणार ; अर्थमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देऊन त्यांना लाभार्थीच्या यादीत टाकल्याने शेती संकट दूर होणार नाही. मतदानाचा टक्के डोळ्यांसमोर ठेवून या लाभार्थी योजना केल्या गेल्या आहेत. शेती संकट दूर करण्यासाठी शेतीमालाला रास्त भाव, ऑपरेशन ग्रीन अंतर्गत कांदा, टोमॅटो सारख्या नाशवंत पिकांसाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत शेतकऱ्यांना संरक्षण, सिंचन, वीज, गोदामे, शीतगृहे, प्रक्रिया उद्योग, रस्ते यासाठी ठोस व भरीव उपाययोजना अर्थसंकल्पात अपेक्षित होत्या. दुर्दैवाने यासाठी नव्याने काहीच करण्यात आलेले नाही. जुनेच पाढे केवळ वाचण्यात आल्याचे नवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सितारामण यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या जनकल्याणांच्या योजनांचा लेखाजोखा मांडला. केंद्र सरकारच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' व्हिजनबद्दल सांगितले. गेले १० वर्ष हा देशासाठी परिवर्तनाचा काळ असल्याचे सांगत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com