Jalgaon News: खानदेशात सातपुडालगत अनेकदा वादळी पाऊस, गारपीट अशी समस्या नेहमी असते. अशा प्रतिकूल स्थितीतही सातपुडालगत केळीबागा वाढल्या आहेत. या बागांना यंदा उष्णतेचा फटकाही कमी बसला आहे. .पूर्वी सातपुडालगत केळी बागा रावेर वगळता अन्य भागांत कमी होत असल्याची स्थिती होती. यंदा उष्णतेत या भागात बागांना कमी फटका बसला. तसेच अलीकडे शेतकरी केळी झाडे, रोपे वाचविण्यासाठी धैंचाचा वापर, ठिबक सिंचन, खते यासंबंधी काटेकोर कार्यवाही करीत आहेत. यामुळे यंदा सातपुडालगत बागा वाढल्याची स्थिती आहे. .Banana Farming: केळी बागेत काटेकोर सिंचनासह कीड, रोग नियंत्रणावर भर.जुन्या, नव्या बागा जोमातसातपुड्यालगत कांदेबाग केळीची लागवडही दिसत आहे. तसेच गेल्या मार्च, एप्रिल, मे व जून या महिन्यातही सातपुडालगत केळीबागांची लागवड वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा व अक्कलकुवा हे तालुके सातपुडालगत आहेत. अनेक आगाप मृग बहर केळीही आहे. काही गावांतच परंपरेने सातपुड्यालगत केळी पीक घेतले जात होते. परंतु अन्य पिकांत कमी नफा, अधिक मेहनत असल्याने या भागात केळी पीक वाढलेले आहे..शेतकऱ्यांचे धाडस तापमानामुळे केळी पिकांची वाताहत होते. सातपुड्याच्या पायथ्याशी दर वर्षी वादळी पाऊस, गारपीट होते. रावेरात वादळी पावसाने सातपुड्यालगतच्या भागात केळी बागा आडव्या होण्याचे प्रकार दर वर्षी घडतात. मार्च ते जून या कालावधीत सातपुड्यालगत मोठी हानी होत असते. पण शेतकऱ्यांनी धाडस करून केळी लागवड केली. या भागात केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. शेतकरी आधुनिक शेतीद्वारे केळीचे चांगले उत्पादनही घेत आहेत. .Banana Farming: खानदेशात केळी लागवड रखडत.मोठ्या प्रमाणात लागवड सातपुडालगत चोपडा, यावल, रावेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील तळोदा, शहादा व अक्कलकुवा भागात केळीची लागवड सुमारे २५ ते ३० हजार हेक्टरवर आहे. ही लागवड खानदेशातील एकूण लागवडीतील ३० ते ३५ टक्के एवढी आहे. यंदा मे व जूनमध्ये तापमान या भागात कमी होते. ४० ते ४२ अंशांपर्यंत गेले होते. प्रचंड उष्णतेची लाट यंदा नव्हती. यात सातपुड्यातील जलसाठे मुबलक असल्याने लागवडीत वाढ झाल्याची माहिती मिळाली..दृष्टिक्षेप...२०२३ मध्ये वाढत्या तापमानामुळे मे अखेरीस व जूनमध्ये घराबाहेर निघणे कठीण झाले होते. उष्ण झळांचा फटका शेती पिकांनाही बसला होता. यावल, चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अनेक केळीबागा करपल्याने नुकसान झाले होते. .तुलनेत २०२४ मध्ये मे महिन्यात अनेक भागात पाऊस झाला. ढगाळ वातावरण होते. काही भागात वादळाचा फटका केळी बागांना बसला. पण कमाल क्षेत्रातील केळीबागा मे महिन्याच्या उष्णतेपासून बचावल्या. यामुळे या भागात सध्या केळी काढणीवर अधिक आहे. उष्णतेत अनेकांच्या बागा काढाव्या लागतात. उत्पादन कमी असते. पण या भागात यंदा बागा जोमात असल्याने त्यातून आवक सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.