Solapur News : करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवारी (ता. १७) सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने केत्तूर येथील युवा शेतकरी विनोद नवले यांच्या काढणीयोग्य केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नवले यांची १२ एकर वेलची व जी नाईन जातीच्या केळीपैकी ६ एकर क्षेत्रावरील ६ हजार केळीची झाडे उन्मळून पडली आहेत.
त्यामुळे त्यांचे जवळजवळ २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची पाहणी करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नवले यांनी केली आहे.
वातावरणात व हवामानात वारंवार बदल झाल्याने या वर्षी गावरान आंब्याला कमी प्रमाणात आंबे लागले होते ते आंबेही या वाऱ्याने गळून पडले आहेत. त्यामुळे या वर्षी गावरान आंब्याची चव चाखायला कमी प्रमाणात मिळणार असेच दिसत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.