थोडक्यात माहिती...१) जळगाव जिल्ह्यातील ७२ हजार केळी उत्पादकांनी ७७ हजार हेक्टर क्षेत्रासाठी पीकविमा घेतला आहे.२) विमा कालावधी नोव्हेंबर २०२४ ते जुलै २०२५ असा असून भरपाई ४५ दिवसांत मिळावी अशी अट आहे.३) माजी खासदार उन्मेष पाटील यांनी जाहीर केलेल्या महसूल मंडळांच्या यादीत नव्या मंडळांचा उल्लेख नाही.४) सुमारे ५ हजार विमाधारकांचे प्रस्ताव फेटाळले गेल्याची माहिती समोर आली आहे.५) कृषी विभाग व विमा कंपनीकडून स्पष्टीकरण न मिळाल्याने शेतकरी गोंधळलेले आणि नाराज आहेत..Jalgaon News: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून केळी पिकासंबंधीच्या नुकसानीच्या परताव्यास पात्र महसूल मंडळांची यादी माजी खासदार उन्मेष पाटील यांनी प्रसारित केली आहे. पण या माहितीमध्ये नव्या महसूल मंडळांचा कोणताही उल्लेख नाही. यातच या माहितीसंबंधी कृषी विभाग व विमा कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण न आल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. .या योजनेत जिल्ह्यातील सुमारे ७२ हजार केळी उत्पादक सहभागी झाले असून, ७७ हजार हेक्टर एवढ्या केळीखालील क्षेत्रासाठी विमा संरक्षण घेण्यात आले आहे. योजनेतून नोव्हेंबर २०२४ ते जुलै २०२५ या नऊ महिन्यांसाठी केळी पिकास विमा संरक्षण आहे. हा विमा कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत पात्र विमाधारकांना विमा कंपनीकडून परतावे किंवा भरपाई मिळावी, असा संकेत आहे. .Crop Insurance: नवीन पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प.यातच या योजनेत केळी पिकासंबंधी भरपाईस पात्र ठरलेल्या महसूल मंडलांची यादी, माहिती माजी खासदार पाटील यांनी समाज माध्यमांतून जारी केली. यात जिल्ह्यात नव्याने निर्मित २४ महसूल मंडलांपैकी कुठल्याही महसूल मंडलाची माहिती नाही..Crop Insurance : खरीप पीकविमा योजनेला कमी प्रतिसाद.जिल्ह्यात जळगाव तालुक्यात शिरसोली व कानळदा, यावलमध्ये अंजाळे व सावखेडासीम, चोपड्यात आडगाव, रावेरात केऱ्हाळे आदी नवीन महसूल मंडले आहेत. तसेच सुमारे पाच हजार केळी विमाधारकांचे प्रस्ताव या योजनेतून २०२४ संबंधी फेटाळल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. .या सर्व बाबींमुळे विमाधारकांत गोंधळ उडाला असून संभ्रमाची स्थिती आहे. यावर कृषी विभाग, विमा कंपनीने लागलीच स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता होती. परंतु कोणतीही माहिती, पत्रक यावर कृषी विभागाने जारी केलेले नाही. यामुळे विमाधारक शेतकऱ्यांतही नाराजी आहे. .परताव्यांबाबत वेळेत कार्यवाही व्हावी : विमाधारककृषी विभाग व विमा कंपनीने यंदाही विमा योजनेसंबंधी गोंधळ केला आहे. कारण अनेकांचे विमा प्रस्ताव उशिरा मंजूर झाले आहेत. त्यात परतावे वेळेत मिळतील की नाही, याबाबत शंका आहे. कारण परतावा देण्यासंबंधी पूर्वप्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. पण परतावे वेळेत मिळावेत, योग्य माहिती यासंबंधी कृषी विभागाने जारी करावी, अशी मागणी केली जात आहे..वारंवार विचारले जाणारे प्रश्न...१) जळगाव जिल्ह्यात किती केळी उत्पादकांनी पीकविमा घेतला आहे?सुमारे ७२ हजार शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे.२) या विमा योजनेचा कालावधी किती आहे?नोव्हेंबर २०२४ ते जुलै २०२५ हा नऊ महिन्यांचा कालावधी आहे.३) विमा परतावा शेतकऱ्यांना कधी मिळणार?विमा कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत परतावे अपेक्षित आहेत.४) नव्या महसूल मंडळांचा यादीत उल्लेख का नाही?माजी खासदारांच्या माहितीनुसार, जाहीर केलेल्या यादीत २४ नव्या महसूल मंडळांचा समावेश नाही, याबाबत स्पष्टता दिलेली नाही.५) किती शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव फेटाळले गेले आहेत?सुमारे ५ हजार विमाधारकांचे प्रस्ताव २०२४ मध्ये फेटाळले गेले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.