
Palghar News : जव्हार तालुक्यातील बहुसंख्य ग्रामस्थ हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. सध्या शेतीत आमूलाग्र बदल होत आहे. याकरिता राज्य तथा केंद्र शासनाच्या योजना फलदायी ठरत आहेत. केंद्र सरकारच्या पीएम किसान निधी सन्मान योजनेचा हप्ता जमा झाला आहे; मात्र तालुक्यातील ११,७५४ लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधीची प्रतीक्षा लागली आहे.
केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून ६ हजार रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते. ४ महिन्यांत २ हजारप्रमाणे ३ वेळा रक्कम बँकेत जमा होते; मात्र केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली. शासन निर्णय निर्गमित केला; मात्र अजूनही या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्र राज्य सरकारनेदेखील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.