
Palghar News : डहाणू तालुक्यातील सुमारे ४० ते ४५ गावांमध्ये तब्बल साडेसहा हजार एकर जमिनीवर मिरची, भोपळी मिरची आणि आरची मिरचीची लागवड केली जाते. येथील मिरचीला मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, तसेच गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, वापी यांसारख्या मोठ्या बाजारपेठांत मागणी आहे.
बावडा, कैतखाडी, चंद्रनगर, कोटिम, आसनगाव, साखरे, सारणी, वाघाडी, वांगर्जे यासारख्या ४० ते ४५ गावांमधील साडेसहा ते सात हजार एकर जमिनीवर मिरचीचे उत्पादन घेतले जाते. ‘सूर्या’तील कालव्याचे पाणी, नदीचे, तसेच विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा वापर करून भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर शेती ओलिताखाली आणली गेली.
डहाणू तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिक भातशेती करता करता भाजीपाला, फूलशेती, तसेच आधुनिक स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट उत्पादनाकडे वळल्याने आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे.
या भागातील पावसाळ्यानंतर मोलमजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबांना मिरची लागवड हा आर्थिक उभारीसाठी प्रभावी पर्याय ठरला आहे. दररोज सुमारे २०० ते २५० टन मिरची बाजारपेठांमध्ये पाठवली जाते.
सध्या मिरचीला ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो भाव आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा येत आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञानात शेडनेट आणि स्प्रिंकलरचा वापर केल्याने भाजीपाला उत्पादन वाढत आहे. तिखट मिरचीबरोबरच विविधरंगी ढोबळी मिरचीचे उत्पादनदेखील घेतले जात आहे. यासाठी अनेक शेतकरी कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठाचेही मार्गदर्शन घेत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.