Amaravati News : संत्राच्या हर्रासादरम्यान शेतकरी व व्यापारी यांच्यात भावाच्या मुद्द्यावरून वाद झाला. परिणामी शेतकऱ्यांना आपला माल संबंधित कंपनीमधून परत न्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या कंपनीविरोधात नाराजी व्यक्त करीत आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
मागील दोन वर्षांपासून वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्र्याच्या खरेदीसाठी एक कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांचा संत्रा हर्रास पद्धतीने विकली जाते. अशातच शुक्रवारी (ता. ४) बाजार समितीच्या परिसरात संत्र्याचा बाजारभाव २८ रुपये किलोप्रमाणे ठरविण्यात आला.
त्यानंतर काही वेळाने शेतकरी संत्र्याचा हर्रास करण्यासाठी गेले असता त्यांना २८ वरून १६ रुपये भाव मिळाला. एकाच दिवशी दोन भाव कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारल्यानंतर कंपनीच्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांसमवेत वाद घातल्यामुळे काही वेळ बाजार समितीमध्ये वातावरण तापले होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल कुणीच न घेतल्यामुळे त्यांनी तेथून माल परत नेल्याने आर्थिक नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेऊन योग्य तो भाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी नितीन पेलागडे यांनी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.