
Raigad News : देशभरातील शेतकऱ्यांची शेती सुजलाम-सुफलाम करण्यात अलिबाग येथील आरसीएफ खतनिर्मिती प्रकल्पाचा मोठा वाटा आहे, परंतु या प्रकल्पामुळे थळ परिसरातील बोरीस- गुंजीस येथील हजारो शेतकऱ्यांची जमीन अमोनिया वायू गळतीमुळे धोक्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असली तरी कंपनी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतांमधील भाताची रोपे पिवळी पडून दोनशे हेक्टरहून अधिक पिकती जमीन नष्ट होण्याचे संकट ओढावले आहे,
मात्र भातशेतीवरील हा परिणाम कारखान्यातील अमोनिया वायूमुळे झाला नसल्याचे कंपनी प्रशासनाचे म्हणणे आहे. कृषितज्ज्ञांमार्कत परिसरातील पिकांची पाहणी करण्यात येणार आहे. नुकसानभरपाई मिळण्यासाठीही अद्याप कोणत्याही शेतकऱ्याची मागणी आली नसल्याचे आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी राकेश कवळे यांनी सांगितले.
शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत कंपनी प्रशासनाकडे लेखी पत्र देऊन समस्या सोडविण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली आहे, परंतु कंपनी प्रशासन बैठक लावण्यास टाळाटाळ करीत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
बोरीस-गुंजीस परिसरात तीनशेहून अधिक शेतकरी भात व इतर पिकांची लागवड करतात. भातशेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, मात्र वायू गळतीमुळे शेती नापीक होत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
अमोनियामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत कंपनी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.