Road Work Issues: एमएसआरडीसीकडून विविध ठिकाणी रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे रस्त्याकडेला असणाऱ्या दुकानांमधील वस्तू व मालाचे धुळीमुळे नुकसान होत आहे. .त्यामुळे कंत्राटदाराने दिवसातून किमान दोन ते तीन वेळा रस्त्यावर पाण्याचा मारा करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे..Dust Pollution: धुळीमुळे श्वसनाच्या आजारात वाढ.तालुक्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम मागील सात ते आठ महिन्यांपासून एमएसआरडीसीकडून सुरू आहे. .Khandesh Farmer Issue: खानदेशात ढगाळ वातावरणाचा शेतकऱ्यांना धसका.अनेक ठिकाणी रस्ते खोदून त्यावर सिमेंट खडी व मुररमाचे थर टाकले आहेत. मात्र या कामादरम्यान उडणाऱ्या धुळीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या मार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. .त्यामुळे वाहने गेली की प्रचंड धूळ उडून समोरील वाहन दिसेनासे होते. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका संभवतो. या मार्गावरून प्रवास करताना डोळे, नाक, तोंडात धूळ शिरत असून दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.