Akhilesh Yadav On Farmer Issue : आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशाचे राजकारण तापू लागले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधत आरोप केले आहे. .भाजप सरकारने गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करत भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी आहे, अशी कठोर टीका त्यांनी सोमवारी (ता.१४) केली आहे..लखनौ येथे पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध खापांच्या प्रमुखांसह शेतकऱ्यांशी अखिलेश यादव यांनी संवाद साधला. यावेळी भाजपच्या आश्वासनांची आठवण त्यांनी करून दिली. ते म्हणाले, "भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाच्या आश्वासनांची पूर्तता न करता शेतकरी समाजाची दिशाभूल केली. दहा वर्षे झाली अजूनही आश्वासन पूर्ण केलं नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही केवळ राजकीय निवडणूक नसून शेतकऱ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे." असा आरोपही त्यांनी केला..बियाणे आणि खतांचा मुद्दा शेतकऱ्यांना बियाणे आणि खत वेळेत उपलब्ध होत नसल्याचा मुद्दाही अखिलेश यांनी उपस्थितीत केला. खतासाठी शेतकऱ्यांना अनेक दिवस रांगेत उभं राहावं लागतं. काही ठिकाणी विनाकारण शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. .तसेच खत आणि इतर कृषी निविष्ठांच्या वितरणात नफा आणि दलालांच्या माध्यमातून भ्रष्टाचार वाढल्याचा दावाही अखिलेश यांनी केला. तसेच बाजारपेठांमध्ये दलालांचा प्रभाव वाढला असून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नाही. भाजपच्या सरकारांनी शेतकरी समाजाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, असेही ते म्हणाले. .Sugarcane Diseases Management: उसावरील पोक्का बोंग, तांबेरा, पानांवरील ठिपके रोगांचे नियंत्रण.ऊस उत्पादकांना २४ तासांत पैसेअखिलेश यादव यांनी २०२७मध्ये समाजवादी पक्षाचं सरकार सत्तेत आल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. ऊस कारखान्याने घेतल्यानंतर २४ तासांच्या आत शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देण्याची व्यवस्था केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. .तर शेतकऱ्यांना खत, बियाणे आणि सिंचनाची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. खतासाठी शेतकऱ्यांना दिवसेंदिवस किंवा आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी योग्य व्यवस्था केली जाईल, असं यादव यांनी सांगितलं..शेतकऱ्यांना इथेनॉल निर्मितीचाही फायदा मिळायला हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली. ऊस आणि इथेनॉलशी संबंधित मूल्यसाखळीत शेतकऱ्यांचा फायदा वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. .दरम्यान, उत्तर प्रदेश ऊस उत्पादनातील प्रमुख राज्य आहे. राज्यातील राजकारणावर ऊस उत्पादकांच्या प्रश्नांचा प्रभाव आहे. त्यामुळे ऊस प्रश्नांवर समाजवादी पक्षाकडून जोर देण्यात येत आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.