Ai in Sugarcane: महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकातही एआय ऊस शेती हवी: कानडी शेतकऱ्यांची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी
Karnataka Farmers Demand: महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या यशस्वी प्रयोगाचा आदर्श घेऊन कर्नाटकातही हे तंत्रज्ञान राबवावे, अशी मागणी तेथील ऊस उत्पादकांकडून होत आहे.