Rabi Season : परभणी पावसाचे असमान वितरण आणि प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. संकटाच्या स्थितीत कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसोबत राहील, अशी ग्वाही मान्यवर तसेच तज्ज्ञांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गुरुवारी (ता. १७) आयोजित रब्बी पीक परिसंवादात दिली. यावेळी रब्बी पिकांच्या बियाणे विक्रीचा प्रारंभ करण्यात आला..विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय, कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त गुरुवारी (ता. १७) कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात रब्बी पीक परिसंवाद व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आभासी माध्यमातून मार्गदर्शन केले. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, भारतीय किसान संघाचे प्रांत संघटनमंत्री आणि प्रगतशील शेतकरी दादा लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा अध्यक्षस्थानी होते..Maharashtra Drought Situation: दुष्काळात सरकारचे डोळे आभाळाकडे.नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापर नियोजन ब्युरोचे संचालक डॉ. एन. जी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, डॉ. जी. पी. ओबी रेड्डी, प्रगतिशील शेतकरी मीरा चोपडे, भीमराव डोणगापुरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख उपस्थित होते..Government Schools Crisis: सरकारी शाळांचा बीमोड होण्याची भीती.कृषिमंत्री भरणे म्हणाले, ‘‘पाऊस कमी पडल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम अडचणीत आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रब्बी हंगामाचे चांगले नियोजन करावे.’’ राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, ‘‘सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कृषी क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.’’पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, ‘‘महिलांमुळेच शेती टिकून आहे. राज्य सरकारने महिलांना शेतकरी म्हणून ओळख देण्याचे काम केले आहे.’’ कुलगुरू डॉ. मिश्रा म्हणाले, ‘‘देशामध्ये महाराष्ट्र कृषी क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. ‘महा-ई-पीक पाहणी’ व ‘महाविस्तार’ ॲप देशपातळीवर दिशादर्शक ठरले आहेत.’.दादा लाड म्हणाले, ‘‘परभणी जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असून शास्त्रीय ज्ञानाचा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अवलंब करावा.’’डॉ. पाटील यांनी ‘मराठवाडा जिओपोर्टल’ची माहिती दिली. प्रारंभी रब्बी बियाणे विक्रीचा प्रारंभ करण्यात आला. ‘मराठवाडा जिओपोर्टल’, ‘स्त्री आरोग्य’ या मोबाईल ॲपचे उद्घाटन तसेच विविध पुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.