Pune News: गेल्यावर्षी सेवा आणि उद्योग क्षेत्रापेक्षा चमकदार कामगिरी करणाऱ्या शेती क्षेत्राचा विकास दर यंदा कमी राहीला आहे. शेती आणि संलग्न क्षेत्राचा विकास दर ५.७ टक्क्यांनी घसरला असून यंदा केवळ ३.४ टक्के वाढ राहण्याची शक्यता असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे यंदा शेतीची वाताहत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. .राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राज्याचा ‘आर्थिक पाहणी अहवाल २०२५-२६’ गुरुवारी (ता.५) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला. आर्थिक पाहणी अवालातून शेती क्षेत्राची झालेली वाताहत स्पष्ट झाली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाढ २०२५-२६ मध्ये ७.९ टक्के राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती जास्त असेल. अर्थव्यवस्थेतील सेवा आणि उद्योग क्षेत्राची वाढ यंदा चांगली झाली आहे. सेवा क्षेत्राची वाढ गेल्यावर्षीच्या ८.३ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर पोचली आहे. तर उद्योग क्षेत्राची वाढही ४.३ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांवर पोचली आहे, असे आर्थिक पाहणी पाहणी अवालात स्पष्ट करण्यात आले आहे. .India Agriculture Growth: भारताच्या शेती क्षेत्राची १० वर्षांत ४.४२ टक्के दराने वाढ, चीनला मागे टाकले- नीती आयोग.शेतीची क्षेत्राची कामगिरी मात्र निराशाजनक असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून पुढे आले आह. मागीवर्षी शेती आणि संलग्न क्षेत्राचा विकास दर सर्वाधिक होता. या क्षेत्राची गेल्यावर्षी ९.१ टक्क्याने वाढ झाली होती. परंतु यंदा वाढीचा दर ५.७ टक्क्यांनी कमी झाला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात शेती आणि संलग्न क्षेत्राचा विकास दर केवळ ३.४ टक्के राहील, असे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. .Agriculture Growth: पीक भरघोस, पण भाव कमी; शेतीच्या सकल मूल्यवर्धनात घटीचा अंदाज, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर संकट .शेतीसमोर आव्हानेहवामान बदल, जमीन आणि पाण्याची टंचाई, निविष्ठांचा (बियाणे, खते इ.) वाढता खर्च आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांमुळे शेतीसमोर आव्हाने वाढत आहेत, अशी नोंद आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आली आहे. .पीक नुकसान मोठेराज्यात चालू आर्थिक वर्षात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे खरिपाच्या ९४ लाख ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यातील तब्बल १ कोटी १६ लाख शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका सहन करावा लागला. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ९ हजार २२ कोटींची मदत मंजूर केल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.