Kolhapur Agriculture Electricity News: कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील १२५ गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. उर्वरित गावांकरिताचे काम प्रगतीपथावर असून लवकरच सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. .महावितरणने वीज ग्राहकांच्या सेवा अधिक दर्जेदार देण्याच्या दृष्टीने गारगोटी, राधानगरी आणि आजरा उपविभागात १२४ कोटींची विविध कामे केली आहेत. या कामांचे प्रातिनिधिक स्वरुपात तांबाळे (ता. भुदरगड), कसबा वाळवा व धामोड (ता. राधानगरी) या तीन ठिकाणी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आबिटकर बोलत होते..Agriculture Electricity: साठ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज.‘महावितरणकडून राबवण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही एक सौर क्रांती असून यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आणि अडचणी पटकन सुटत आहेत. या योजनेमुळे शासनास शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देणे शक्य होत आहे. शेतीला दिवसा पाणी देणे शक्य होत असल्याने शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण, जंगली प्राणी यांपासून सुटका झाली. आता त्यांना कुटुंबासही वेळ देता येणार आहे. म्हणूनच ही एक क्रांतिकारक योजना असून याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते’, असेही त्यांनी सांगितले. .Farmer Electricity Scheme: बळीराजा मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटी;अतिरिक्त अधिभार लावून शेतकऱ्यांची अडवणूक .विविध सौर योजनांमुळे महावितरणवरील विजेचा अतिरिक्त ताण कमी होत आहे. पीएम सुर्यघर योजनेमुळे लोकांच्या घराचे वीजबिल शून्य होत आहे. त्यामुळे सौर योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महावितरण अधिकारी-कर्मचारी हे अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करत काम करतात. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुकही आपण केले पाहिजे, असेही पालकमंत्री आबिटकर म्हणाले. .भुदरगड,राधानगरी तालुक्यात १२४ कोटींची कामेमहावितरणने विविध योजनांतून भुदरगड आणि राधानगरी तालुक्यात १२४ कोटींची कामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने ७७ कोटींचे २२ मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प उभा करणे, कसबा वाळवा(१०एमव्हीए) व गवसे-हरपवडे( ५ एमव्हीए) येथे ७ कोटींचे नवीन रोहित्र उभा करणे, १४.२ कोटींचे काम करून विविध आठ ठिकाणांच्या उपकेंद्रांच्या रोहीत्रांची क्षमता वाढ करणे व अतिरिक्त रोहित्र उभा करणे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना आणि विशेष घटक योजनेतून ९.१८ कोटी खर्च करून ३६४ ठिकाणी विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर करणे, नवीन वीज जोडणी योजनेतून ९.३५ कोटी खर्च करून ७६४ नवीन वीज ग्राहकांना वीज जोडणी देणे, विद्युत अपघात टाळण्याच्या दृष्टीने ३.५१ कोटी खर्च करून स्पेसर्स बसवणे, वितरण पेट्या बसवणे, गंजलेले पोल व तारा बदलणे आदी कामे करण्यात आली आहेत. कृषी आकस्मिक निधी योजनेतून ४.८० कोटी खर्च करून मासेवाडी (ता.आजरा) येथे ५ एमव्हीए क्षमतेचे नवीन उपकेंद्र उभा करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.