
Buldana News : आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, खते व कीटकनाशके मिळावीत या उद्देशाने जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने भरारी पथकांची स्थापना केली आहे. हंगामासाठी जिल्ह्यात १४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यात जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत प्रत्येकी १ आणि जिल्हास्तरावर १ भरारी पथक असेल. गेल्या हंगामात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत बोगस बियाणे, खते, कीटकनाशकांची विक्री केल्याप्रकरणी सुमारे ३५० परवाने रद्द केले आहेत.
खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा राहतो. या वेळी शेतकऱ्यांना बोगस कृषी निविष्ठा मिळू नये, याची खबरदारी कृषी विभाग घेत असतो. वेळोवेळी जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून नमुने काढले जातात.
यासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांत प्रत्येकी एक आणि जिल्हा स्तरावर एक अशी १४ पथके बनवण्यात आली आहेत. बोगस खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री होत असल्यास तालुका कृषी अधिकारी अथवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश सावंत यांनी केले आहे.
गेल्या वर्षातील कामगिरी
कृषी विभागाने नेमलेल्या पथकांनी सन २०२४-२५ मध्ये विविध कृषी निविष्ठांचे एकूण दोन हजार १६२ नमुने तपासणीसाठी घेतले. यात बियाणांचे १ हजार ३१२, खते ६१९ आणि कीटकनाशकांच्या २३१ नमुन्यांचा समावेश होता. यापैकी ८१ नमुने तपासणीमध्ये नापास आले आहेत. १७ प्रकरणांमध्ये सक्त ताकीद दिली होती.
११ प्रकरणे न्यायालयात, तर १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. तपासणीमध्ये बोगस बियाणे विक्री करताना आढळलेल्या ११६ केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
एकूण परवाने रद्द ३५०
रासायनिक खते ११८
कीटकनाशके ११६
बियाणे ११६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.