Roha News : धाटाव एमआयडीसीतील अनेक रासायनिक कंपन्यांमधील लाखो लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता दररोज कुंडलिका नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी काळवंडली असून उग्र दर्प येतो.
याबाबत सोमवारी (ता.४) ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, पाण्याचे नमुने घेतले. या पाण्यात रसायन आढळल्याने एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारखानदार आणि एमआयडीसीला नोटीस बजावली आहे.
धाटाव एमआयडीसीतील काही रासायनिक कंपनीचे अधिकारी येथील सीईटीपी केंद्रातील कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडतात. हा गोरखधंदा मध्यरात्री ते पहाटेपर्यंत होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.अवकाळी पावसात दूषित पाणी तर थंडीत धुक्याचा गैरफायदा घेत घातक रसायने हवेत सोडली जातात. त्याचा मानवी जीवनाबरोबरच पशु-पक्ष्यांवर गंभीर परिणाम होतो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.