Yavatmal News Update : यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांत यंदा मुबलक जलसाठा आहे. जिल्ह्यातील ७५ प्रकल्पांत सद्यःस्थितीत ४६.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने यंदा टंचाईची (Water Shortage) तीव्रता कमी आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने भूजलपातळी वाढली होती. अतिवृष्टी, संततधार पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पाऊस जास्त झाल्याने सद्यःस्थितीत सर्वच प्रकल्पात जलसाठा शिल्लक दिसत आहे.
शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक घेता आले. जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू असे ७५ प्रकल्प आहेत. यात सद्यःस्थितीत ४६.२० टक्के जलसाठा शिल्लक आहे.
एप्रिल महिन्यात प्रकल्पांमध्ये जलसाठा असल्याने नागरिकांना टंचाईचे चटके अद्याप बसलेले नाही. जलसाठा असल्याने येणाऱ्या काळातही टंचाईची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे.
काही भागांत टंचाई डोके वर काढणार असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे.
त्यात प्रामुख्याने अडाण प्रकल्पात ५१.४५ टक्के, नवरगाव ३०.९३, गोकी ५६, वाघाडी ५५.४६, सायखेडा ५२.४३, अधर पूस ६०.३७, बोरगाव प्रकल्पात ३३.१३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
मोठे प्रकल्पही भरलेले
जिल्ह्यातील प्रकल्पांत ४६.२० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोठा प्रकल्प असलेल्या पूस ४३.६३ टक्के, अरुणावती ४२.७५, बेंबळा प्रकल्पात ४२.९२ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ६५ लघू प्रकल्पात ४४.४९ टक्के जलसाठा आहे.
मोठ्या व मध्यम प्रकल्पांत बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.