
Nagar News :बिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणकडून अभय योजना सुरू केली आहे. राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेतून ग्राहकांना थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत. थकीत वीजबिलामुळे राज्यातील सुमारे ३८ लाख ग्राहकांचा वीज कायमस्वरूपी बंद केली आहे.
अशा ग्राहकांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या संकल्पनेतून १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली आहे.
थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली आहे. राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही.
१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ असा योजनेचा कालावधी आहे. ३८ लाख ग्राहकांकडून मूळ बिलाची ५०४८ कोटींची रक्कम, १७१९ कोटी व्याज आणि ६९ कोटी ९० लाख रुपये विलंब आकार येणे आहे. ग्राहकांना www.mahadiscom. in/wss/wss या संकेतस्थळावरून तसेच महावितरणच्या अॅपवरूनही योजनेचा लाभ घेता येईल.
हप्तेही पाडून मिळणार अभय योजनेत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरायची सवलत ग्राहकांना मिळेल.
जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघूदाब ग्राहक एक रकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल असे सांगण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.