Washim News: वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील प्रगतिशील शेतकरी रामप्रसाद क्षिरसागर यांनी नाविन्यपूर्ण औषधी वनस्पती आळीव ची यशस्वीरीत्या लागवड केली आहे. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. डिगंबर इंगोले यांनी या प्रक्षेत्राला भेट देत तांत्रिक पाहणी केली..आळीव हे पीक गहू, हरभरा व तूर यांसारख्या पारंपरिक रब्बी पिकांसाठी एक शाश्वत व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय ठरते. एक ते दोन पाण्याच्या पाळ्यांत यशस्वीरीत्या वाढणारे आळीव पाणी कमी असलेल्या परिस्थितीतही घेता येते..Soil Health: मातीला जिवंत ठेवण्यासाठी काम करावे लागेल.हे पीक कमी खर्चात लागवड होणारे असून चोपण व मध्यम प्रतीच्या जमिनीत अधिक अनुकूल आहे. वाशीम, मालेगाव व रिसोड तालुक्यांमध्ये उपलब्ध जमिनीत आळीव पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करता येण्याची शक्यता आहे..आळीवसाठी प्रति एकर बियाण्याचे प्रमाण २ ते ३ किलो असून, रासायनिक खतांचा वापर केवळ २५ ते ३० किलो प्रति एकर इतका केला जातो. पीक कीडमुक्त व पर्यावरणपूरक असून उत्पादन प्रति एकर ३ ते ५ क्विंटल एवढे आहे. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती ७,३०० ते १०,६०० प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.