Paddy Farming : मुरूडमध्ये ७० टक्के भातलावणी

Paddy Plantation : मुरूड तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भातलावणी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत तालुक्‍यात ७० टक्के भातलागवड पूर्ण झाली आहे.
Paddy Plantation
Paddy Plantation Agrowon
Published on
Updated on

Murud News : तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भातलावणी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत तालुक्‍यात ७० टक्के भातलागवड पूर्ण झाली असून पावसाने उघडीप दिल्यास उर्वरित लावणीदेखील पूर्ण होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

तालुक्‍यात आतापर्यंत २०२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुरूड तालुक्यात भातलागवड क्षेत्र ३,३०० हेक्टर असून अत्यल्प भूधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाताची शेती करतात. भाताचे विविध वाणांमध्ये सुवर्णा, जया, वाडा कोलम, रूपाली, चिंटू, श्री, शुभांगी, सारथी, कोमल आदी प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, येथील शेतकरी शक्‍यतो सुवर्णा, जया, वाडा कोलम, चिंटू आदी वाणांना अधिक प्राधान्य देत आहेत.

Paddy Plantation
Paddy Farming : उरणमध्ये भातशेती ओसाड पडण्याची भीती

यांत्रिक पद्धतीने भातलागवडीसाठी यंदा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतलेला नाही. त्‍यामुळे यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, यांत्रिकीकरणाने भातलागवड करण्यासाठी २०-२१ दिवस आधी यंत्रधारकांना पूर्वकल्पना द्यावी लागते. म्हणजे त्या प्रमाणात ते रोपांचे ट्रे तयार करतात.

एकरी किमान ८० ट्रे लागतात. ट्रेसाठी माती चाळणे, मातीत शेणखत मिसळणे इ. तयारी आधीच करावी लागते. तालुक्यामधे यंत्र उपलब्ध नसल्याने जास्त शेतकऱ्यांना याविषयी माहिती नाही; परंतु यावर्षी प्रात्यक्षिके बघितल्याने चोरढे पंचायत हद्दीतील बऱ्याच शेतकऱ्यांनी पुढील वर्षी यंत्राने लागवड करण्याचे ठरवले असल्‍याचे भुजबळ यांनी संागितले.

Paddy Plantation
Paddy Plantation : खेडच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडी अंतिम टप्प्यात

पंतप्रधान पीकविम्याविषयी उदासीनता

तालुका कृषी कार्यालयाकडून प्रधानमंत्री पीकविम्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायत पातळीवर शेतकऱ्यांना पीकविमा अवघा एक रुपयात काढा, असे आवाहन करण्यात येत आहे. ३१ जुलैची असलेली अखेरची मुदतही वाढवून दिली आहे.

तरीदेखील काही ठिकाणी सीएससीवर नोंदणी सुरू असली तरी म्हणावा तसा प्रतिसाद दिसून येत नसल्‍याचे चित्र आहे. पीकविमा प्राप्त होण्यासाठी निकषाप्रमाणे भातपिकांची आणेवारी ५१ टक्क्‍यांपेक्षा कमी असावी लागते; परंतु कोकणात ही टक्केवारी ६० ते ७० टक्क्‍यांपेक्षा अधिक भरते. पर्यायाने पीकविम्याची रक्कम दिली जात नाही. ही मोठी अडचण ठरत असल्‍याचे बोलले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com