
Koyna Dam Satara News : जिल्ह्यातील गतवर्षीच्या तुलनेत कोयना, धोम धरणात कमी, तर कण्हेर, उरमोडी, तारळी व धोम-बलकवडी धरणांत जास्त पाणीसाठा (Koyna Dam Water Stock) उपलब्ध आहे.
जिल्ह्यात पाणीटंचाई (Water Shortage) होऊ नये यासाठी धरणांतील पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. धरणातून सिंचनासाठी दोन हजार क्युसेकने पाण्याचा विर्सग केला जात आहे.
जिल्ह्यात दमदार पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील धरणे पाण्याने भरून वाहिली होती. सर्व प्रमुख धरणांत पाणीसाठा शिल्लक आहे.
कोयना राज्यासाठी लागणारी वीजनिर्मिती तसेच जलसिंचनासाठी कोयना धरण सर्वांत महत्त्वाचे आहे. या धरणात गतवर्षी ७७.८६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होते.
तुलनेत यावर्षी पाच टीएमसीने कमी असून, धरणात ७२.०८ टीएमसी पाणी आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. यामुळे या धरणातून वीजनिर्मिती तसेच टंचाईसाठी करावा लागणारा पाणीपुरवठा याचे नियोजन करावे लागणार आहे.
कोयना धरणाप्रमाणे धोम धरणांतही पाणीसाठा कमी शिल्लक आहे. धोम धरणात गतवर्षी तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
गतवर्षी धोम धरणात १०.२८ तर यावर्षी ९.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या उरमोडी धरणात गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.
उरमोडी गतवर्षी ५.८५, तर या वर्षी ७.४१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कण्हेर, तारळी, धोम-बलकवडी याही प्रमुख धरणांत गतवर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे.
कण्हेर धरणात गतवर्षी ६.१५, तर या वर्षी ६.२५, तारळी धरणात गतवर्षी ३.६७, तर या वर्षी ४.६० व धोम-बलकवडी धरणात १.२४, तर या वर्षी २.६१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
प्रमुख धरणांतील पाण्याची एकूण टक्केवारी
कोयना - ६८.४८, धोम-७२.६०, उरमोडी-७४.३३, कण्हेर-६१.६१,
धोम-बलकवडी-६३.५१, तारळी- ७८.६२.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.