Floods in Gujarat, Manipur and Tripura : केंद्र सरकारकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून गुजरात, मणिपूर आणि त्रिपुराला ६७५ कोटींचा निधी

Flood funds in Gujarat, Manipur and Tripura : आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूरमध्ये पुराच्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
Flood funds in Gujarat, Manipur and Tripura
Flood funds in Gujarat, Manipur and TripuraAgrowon
Published on
Updated on

Pune News : यंदा पावसाने देशभर थैमान घातला. महाराष्ट्रासह आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूरमध्ये पूर आला होता. तर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती पहायला मिळत आहे. यामुळे येथील राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे मदत मागितली होती. पण केंद्राने गुजरातवर मेहरनजर करत ६०० ६०० कोटी रुपयांचा मदत निधी दिला. तर मणिपूर आणि त्रिपुरा राज्याच्या तोंडाला पाने पूसत दोघाच फक्त ७५ कोंटीचा निधी दिला आहे. हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून केंद्राच्या वाट्यातील देण्यात आला आहे.

यंदा देशभर चांगला पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाचा फटका बसला. यामध्ये केरळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठी वित्त आणि जीवितहानी झाली. तर महाराष्ट्रासह आसाम, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूरमध्ये पूर आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळोवेळी केंद्र सरकार पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली होती.

Flood funds in Gujarat, Manipur and Tripura
Bihar Flood : बिहारमध्ये पूरस्थिती कायम; बागमती नदीवरील बंधारा फुटला

यानंतर आता केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) मधून गुजरातला ६०० कोटी रुपये, मणिपूरला ५० कोटी रुपये आणि त्रिपुराला २५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे ठरवले आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून देखील आगाऊ रक्कम मंजूर केली आहे.

यंदा केंद्र सरकारने एसडीआरएफमधून २१ राज्यांना ९०४४.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एनडीआरएफकडून १५ राज्यांना ४५२८.६६ कोटी रूपये आणि राज्य आपत्ती निवारण निधी एसडीएमएफमधून ११ राज्यांना १३८५.४५ कोटी रुपये दिले आहेत.

Flood funds in Gujarat, Manipur and Tripura
Flood situation in Marathwada : मराठवाड्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे अजित पवार यांचे निर्देश

तसेच आसाम, मिझोराम, केरळ, त्रिपुरा, नागालँड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मणिपूरमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली जाणार आहे. यासाठी आंतर-मंत्रालयीय केंद्रीय समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. ज्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करून राज्यांना अतिरिक्त आर्थिक मदत करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मदत करतील.

याशिवाय या आंतर-मंत्रालयीय केंद्रीय समित्या लवकरच बिहार आणि पश्चिम बंगालला पाठवण्यात येणार आहेत. अलीकडेच येथे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे आणि पाहणीकरून मुल्यांकन समिती करेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com