Pune News : दौंड : सलग पावसामुळे तालुक्यातील ४०० परप्रांतीय गुऱ्हाळे व २०० वीटभट्ट्या अद्याप बंद आहेत. जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदाच सलग एवढा पाऊस पडल्याने त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला आहे. भरीस भर म्हणून मुळा, मुठा व भीमा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठची सर्व गावे प्रभावित झाली असून नदीकाठच्या शेतातील उभ्या पिकांत पाणी शिरले आहे.
प्रशासनाने मुळा-मुठा नदीत खडकवासला प्रकल्पातील पाणी सोडल्याने नदीकाठचे शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाण्याखाली गेले. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी (ता. २६) पाणी पातळी उतरल्याने दिवसभर अनेक शेतकरी नदीकाठचे बुडालेले विद्युतपंप बाहेर काढताना दिसले. गुऱ्हाळघरे व वीट भट्टी बंद असल्याने अनेक परप्रांतीय कामगार हे नदीकाठी मासेमारी करण्यासाठी आले. एकूणच सलग ३ दिन दिवसांच्या पावसानंतर शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली.
गुऱ्हाळ चालक सोमनाथ ताकवणे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. या पावसाने गुऱ्हाळ गेले काही दिवस बंद आहेत. त्यामुळे गुऱ्हाळाच्या कडेने ऊस गाळपासाठी साठला आहे. दोन दिवसांत जनजीवन स्थिर झाल्यानंतर सर्व स्थिती पूर्ववत होईल.’’
शेतकरी संतोष कोंडे म्हणाले, ‘‘नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.