
Parbhani News : यंदाच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात ता. ३१ जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ३५८ शेतकऱ्यांना २५१ कोटी ४३ लाख रुपये पीककर्ज वाटप केले असून, आजवर ३२.१५ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
आजवरच्या पीककर्ज वाटपात ३ हजार ४८१ शेतकऱ्यांना ४४ कोटी ६९ लाख रुपयाचे नवीन पीककर्ज देण्यात आले तर ३६ हजार ८७७ शेतकऱ्यांनी २०६ कोटी ७४ लाख रुपये पीककर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे.
परभणी जिल्ह्यातील विविध बँकांना यंदाच्या रब्बी हंगामात एकूण ७८२ कोटी ३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
त्यात व्यापारी बँकांना ४४४ कोटी ९ लाख रुपये,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १७२ कोटी ९२ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०७ कोटी १६ लाख रुपये, खासगी बँकांना ५७ कोटी ८६ लाख रुपये उद्दिष्ट आहे.
३१ जानेवारीअखेर राष्ट्रीयीकृत बँकांनी ६ हजार ८४९ शेतकऱ्यांना ७९ कोटी ७४ लाख रुपये (१७.९६ टक्के), तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ३२ हजार ४७६ शेतकऱ्यांना १५६ कोटी २५ लाख रुपये (९०.३६ टक्के) पीककर्ज वाटप केले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ८४० शेतकऱ्यांना ८ कोटी ४८ लाख रुपये, तर खासगी बँकांनी १९३ शेतकऱ्यांना ६ कोटी ९६ लाख रुपये पीककर्ज वाटप केले आहे. गतवर्षी (२०२४) ३१ जानेवारी अखेरपर्यंत ४६ हजार ५८० शेतकऱ्यांना ३७५ कोटी ६६ लाख रुपये (५०.४४ टक्के) पीककर्ज वाटप झाले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.