Farmer Death : राज्यात १० महिन्यांत २३६६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Farmer Issue : राज्यात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेतीमालाला भाव नसणे अशा अनेक कारणांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Farmer Death
Farmer DeathAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या काळात राज्याच्या विविध भागांत २ हजार, ३६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी गुरुवारी (ता. १४) विधानसभेत सादर करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ९५१ आत्महत्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

राज्यात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेतीमालाला भाव नसणे अशा अनेक कारणांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आल्याबद्दल व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याबाबत कुणाल पाटील,

Farmer Death
Farmer Death : शेतकरी आत्महत्यांप्रकरणी न्यायालयाने घ्यावी दखल

रवींद्र वायकर, राजन साळवी, सुनील प्रभू, अस्लम शेख आदी सदस्यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. यावर मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी सादर करण्यात आली.

Farmer Death
Farmer Death : रोगनिदान होऊनही दगावताहेत रोगी

राज्यात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परत फेडीचा तगादा या कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने एक लाख रुपयांची मदत दिली जाते.

विभागनिहाय शेतकरी आत्महत्या

अमरावती-९५१

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा)-८७७

नाशिक-२५४

नागपूर-२५७

पुणे-२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com