Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत २१ टक्के पाणीसाठा

Water Crisis : मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात या प्रकल्पांत १६५८ दशलक्ष घनफूट म्हणजे २१ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
Water Storage
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. यामुळे लघू व मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने खालावू लागला आहे. जिल्ह्यात पाच मध्यम व ७८ लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत.

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात या प्रकल्पांत १६५८ दशलक्ष घनफूट म्हणजे २१ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांसाठी पाणी पुरणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून, पाणी नसल्याने पिके आणि जनावरे कशी जगवायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

जिल्ह्यात गेली चार वर्षे समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीही वाढली होती. पाण्याची टंचाई भासली नसल्याने दुष्काळी पट्ट्यात बागायती म्हणजे ऊस लागवडही वाढली होती. मात्र यंदा पावसाने दडी मारली.

अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलीच नाहीत. त्यामुळे सप्टेंबरपासून पाणी पातळी कमी होऊ लागली. परिणामी, खरीप हंगामही वाया गेला. तसेच रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी वाळून गेली.

Water Storage
Water Shortage : डोणवत धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट

जिल्ह्यात पाच मध्यम व ७८ लघु असे एकूण ८३ प्रकल्प असून, त्याची साठवण क्षमता ९४४० दशलक्ष घनफूट आहे. फेब्रुवारीतील शेवटच्या आठवड्यात २६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये ४०० दशलक्ष घनफूट म्हणजे सहा टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे.

Water Storage
Water Shortage : छत्रपती संभाजीनगरमधील २३८ गावे, ४५ वाड्यांची तहान टॅंकरवर

वास्तविक, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे आवर्तन सुरू आहे. मुख्य कालव्याने पाणी बहुतांश लाभ क्षेत्रात पोहोचले आहे. अनेक भागांत अद्याप योजनांचे पाणी पोहोचलेले नाही. त्यातच लाभ क्षेत्रातील तलाव या सिंचन योजनांच्या पाण्याने भरले नसल्याने पाणी टंचाईची स्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे दोन महिने पाणी कसे पुरणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

जिल्ह्यातील लघू, मध्यम प्रकल्पांची सद्यस्थिती

जिल्ह्यात एकूण ८३ प्रकल्प आहेत. त्यापैकी १८ प्रकल्प कोरडे पडले आहेत. जत तालुक्यात २८ प्रकल्प असून त्यापैकी १२ प्रकल्प कोरडे असून कवठेमहांकाळ तालुक्यातील चार तर आटपाडीतील दोन प्रकल्प कोरडे आहेत. १३ प्रकल्पांत मृत पाणीसाठा आहे.

यंदा पाणीसाठ्यात ३६८८ दशलक्ष घनफुटांनी घट

गतवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ८३ प्रकल्पांत ३५४६ दशलक्ष घनफूट म्हणजे ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मार्चमध्ये १६५८ दशलक्ष घनफूट म्हणजे २१ टक्के पाणीसाठ शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३६८८ दशलक्ष घनफुटांनी पाणीसाठा कमी झाला आहे.

जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठा दृष्टीक्षेप

तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी

तासगाव ७ ८३.०५ १५

खानापूर ८ १२५.७९ २४

कडेगाव ७ २७७.४७ ४४

शिराळा ५ २५९.१५ ४४७.९१

आटपाडी १३ ४२३.२१ ३७

जत २७ २७५.९२ ९

कवठेमहांकाळ ११ १९४.१९ २३

मिरज ३ ७.८० ६

वाळवा २ ७.७० १६

एकूण ८३ १६५८.२७ २१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com