Crop Insurance : पीकविमा कंपन्यांचा १९ हजार शेतकऱ्यांना ठेंगा

Crop Insurance Compensation : निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे म्हणून पीकविमा काढले जातो. मात्र, सावनेर तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकरी यापासून वंचित राहिले.
Crop Insurance
Crop InsuranceAgrown
Published on
Updated on

Nagpur News : निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे म्हणून पीकविमा काढले जातो. मात्र, सावनेर तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकरी यापासून वंचित राहिले. तर शासन आणि पीकविमा कंपन्यांना वारंवार विचारणा करूनही त्यांनी निराशा केली. या वर्षीचा खरीप व रब्बी हंगामातील विमा कागदावरच दिसून येतो.

शासनाने मोठ्या जोरदार घोषणेने एक रुपयांमध्ये शेतकऱ्‍यांना पंतप्रधान पीकविमा योजना देण्याचे जाहीर केले. तसेच नोंदणीदेखील केली. तसेच शेतकऱ्‍यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस कीटकांचा प्रार्दुभाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्‍यांच्या तोंडाशी घास हिरावला गेला. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : अग्रीमनंतरचा उर्वरित ७५ टक्के विमा तत्काळ द्या, अन्यथा...; स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचा इशारा

पीकविमा काढल्यामुळे त्यांची मदत होईल, अशी अपेक्षा असताना सावनेर तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत. तालुक्यातील २१ हजार ८६६ शेतकऱ्‍यांनी खरीप व रब्बी हंगामातील पीकविमा काढला. त्यातील तक्रार दाखल केवळ २ हजार ५२८ शेतकऱ्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळाला. हे प्रमाण अत्यल्प असून तालुक्यात पीक कापणीचा अहवाल चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पिकांसाठी विमा संरक्षण खरीप हंगामातील ज्वारी, मूग, उडीद, तूर, कपाशी, मक्का, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी भुईमूग या पिकांना पीकविम्याचे संरक्षण आहे.

Crop Insurance
Crop Insurance : एक लाख ९० हजार शेतकऱ्यांना अखेर मिळाला ११३ कोटींचा अग्रिम

केवळ अडीच हजार शेतकऱ्यांना लाभ

सावनेर तालुक्यात खरीप व रब्बी हंगामातील २१ हजार ८६६ इत्यादी शेतकऱ्‍यांनी पीकविमा काढला. यापैकी तक्रारदार २ हजार ५२८ शेतकऱ्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळाला. तर सोयाबीन उत्पादक ६९८ शेतकऱ्‍यांना सरसकट पीकविमा मिळाला. तालुक्यातील १९ हजार ३३८ शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही.

तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्‍यांनी पीकविमा कंपनीकडे तक्रार केली. त्या शेतकऱ्‍यांना पीकविम्याचा लाभ मिळाला. तर ज्या महसूल मंडळात पिकांचे नुकसान झाले आहे. त्या अहवालानुसार विम्याचा लाभ शेतकऱ्‍यांना मिळणार आहे. विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांबाबत विमा कंपनी आणि शासनस्तरावर याबाबत निर्णय प्रक्रिया सुरू आहे.
- सोमनाथ साठे, तालुका कृषी अधिकारी, सावनेर
तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्‍यांना पीकविमा मिळावा, यासाठी तालुकास्तरावर तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना अवगत करणार आहे. पीकविमा कंपनीकडून वंचित शेतकऱ्‍यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल.
- मनोहर कुभांरे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com