Farmer Accidental Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्याचे १८० प्रस्ताव मंजूर

Gopinath Munde Shetkari Accident Insurance Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत खंडित कालावधी ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ मधील जिल्ह्यातील १०६, तर १९ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर १८० प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
Farmer Insurance Scheme
Farmer Insurance SchemeAgrowon

Sangli News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत खंडित कालावधी ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ मधील जिल्ह्यातील १०६, तर १९ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर १८० प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यांच्या वारसांना ३.६० कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. कृषी विभागाकडून वेळेत कार्यवाहीला प्राधान्य दिले जात आहे. यासाठी कृषी विभागाशी संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना १९ एप्रिल २०२३ रोजी सुरू केली आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांना विविध कारणांनी जीव गमवावा लागतो. यात अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

Farmer Insurance Scheme
Farmers Insurance Scheme : गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे ८४ प्रस्ताव मंजूर

सन २०२३-२४ पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू झालेली आहे. अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या वारसदारांनी अनुदानाचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे ३० दिवसांत सादर करावा. प्रस्ताव तयार करताना येणाऱ्या अडचणींविषयी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा शेतकरी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाची मदत घ्यावी.

Farmer Insurance Scheme
Farmer Accident Insurance Scheme : संगमनेर उपविभागात शेतकरी अपघात विम्याचे ५३ प्रस्ताव मंजूर

असे मिळते अनुदान

या योजनेंतर्गत अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली आहे. अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ मिळण्यासाठी अपघातग्रस्ताचा वय दहा ते ७५ वर्षे निश्चित केले आहे.

जिल्ह्यात काही बिगरशासकीय व्यक्ती शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करून अर्ज मंजूर करून आणण्याची हमी देतात. मात्र, ही योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असून अर्ज करणे, अर्ज मंजूर होण्याच्या प्रक्रियेदरम्यान कोणत्याही बिगर शासकीय व्यक्तीचा समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज मंजूर करून देण्याच्या कोणत्याही आमिषास बळी न पडता कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन योजनेत अर्ज करावा.
विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com