
Hingoli News: यावर्षी (२०२५) जून महिन्यामध्ये झालेल्या वादळी वारे, पावसामुळे हिंगोली जिल्ह्यांतील सर्व पाच तालुक्यांतील ३ हजार २४७ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण १ हजार ६११.३७ हेक्टर क्षेत्रावरील ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेत आर्थिक मदत देण्यासाठी अपेक्षित ३ कोटी ६० हजार ४४ हजार ९०० रुपये निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.जिल्ह्यात यंदा ९ आणि १० जून रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिकांचे मोठे नुकसान झाले.
वादळी वाऱ्यामुळे कळमनुरी व वसमत तालुक्यातील घड काढणीस आलेल्या केळी बागांतील झाडे मोडून पडल्याने केळी उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले. भाजीपाला तसेच आंबा आदी फळपिकांना देखील वादळाचा मोठा फटका बसला. जिरायती पिकांचे सेनगाव तालुक्यात ११ हेक्टर नुकसान झाले आहे.
बागायती पिकांचे कळमनुरी तालुक्यातील १.३० हेक्टर,औंढा नागनाथ तालुक्यातील १.०५ हेक्टर, सेनगाव तालुक्यातील ८ हेक्टर मिळून एकूण १०.३५ हेक्टर नुकसान झाले आहे. फळपिकांचे कळमनुरी तालुक्यातील १ हजार ४९.३० हेक्टर, वसमत तालुक्यातील ५२८.४५ हेक्टर, औंढा नागनाथ तालुक्यातील ११.८२ हेक्टर.
सेनगाव तालुक्यातील १ हेक्टर मिळून एकूण १ हजार ५९०.०२ हेक्टर नुकसान झाले आहे.बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी २ हेक्टर मर्यादेत मदत देण्यासाठी जिरायती पिकांसाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपयांनुसार एकूण ९३ हजार रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयांनुसार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.