Solapur News: गेल्या २० वर्षांपासून जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनअंतर्गत कार्यरत तब्बल १ हजार २०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून कर्मचारी असहकाराच्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. .शुक्रवारी (ता. ५) सर्व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या राज्यस्तरीय व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एकाचवेळी बाहेर पडत निषेध नोंदविला. त्यानंतर सोमवारपासून (ता.८) काळी फीत लावून कामकाज करत त्यांनी आंदोलन सुरू केले आहे..MSRTC Employees Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदे यांचे भाष्य; आंदोलनाची तीव्रता राज्यभर .राज्यस्तरीय कृती समितीचे अध्यक्ष रमांकात गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत आणि विलास निकम यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हे आंदोलन सुरु केले. जलजीवन व स्वच्छ भारत मिशनांतर्गत ग्रामस्थांना स्वच्छ पाणीपुरवठा, पाणीकर वसुली, दुरुस्तीदेखभाल, जनजागृती बैठकांचे आयोजन यांसह वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन आदी महत्त्वाच्या योजना हेच कर्मचारी राबवत आहेत..Employee Strike: महा ई-सेवा, आधार केंद्रचालकांचा आजपासून संप.या विभागाने राज्य शासनाला अनेक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवून दिले, तरीदेखील कर्मचाऱ्यांना अस्थिर नोकरी, तीन वर्षांपासून तीन-तीन महिन्यांचे उशिराने मिळणारे वेतन, अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे..न्यायालय निर्णयावर कार्यवाही नाहीगेली १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत औरंगाबाद मॅट न्यायालयाचा निर्णय झालेला असतानाही शासनाने त्याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशाराही कृती समितीने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.