Water Resource Development: नागपूर विभागातील रखडलेल्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतील अपूर्ण राहिलेल्या ११० सिंचन विहिरींची कामे आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करता येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शाश्वत सिंचनाची अपेक्षा पुन्हा बळावली आहे..नियोजन विभागाच्या ६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार नागपूर विभागासाठी अतिरिक्त १३ हजार सिंचन विहिरींचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम मंजूर करण्यात आला होता. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि उत्पादनवाढीस चालना देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. मात्र, विविध प्रशासकीय व तांत्रिक कारणांमुळे अनेक विहिरींची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे या कार्यक्रमाला यापूर्वीही अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती..Irrigation Wells Issues: सिंचन विहिरींचे बांधकाम होऊनही देयके रखडली.दरम्यान, ३१ मे २०२६ रोजी योजनेची मुदत संपल्यानंतर उर्वरित कामांचे भवितव्य अनिश्चित झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रलंबित कामांची दखल घेत मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. विशेषतः यंदा हवामानातील बदल आणि संभाव्य अल्पवृष्टीची शक्यता लक्षात घेता हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे..Irrigation Wells: विहीर दुरुस्ती मंजुरीचे अधिकार बीडीओंना.अधिकृत माहितीनुसार, धडक कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ३८६ सिंचन विहिरींपैकी २७६ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. तर ११० विहिरींची कामे अद्याप अपूर्ण असून ती येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. तसेच सन २०२५-२६ पर्यंत उपलब्ध करून दिलेल्या निधीचा पूर्ण विनियोग करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे..नागपूर विभागातील अनेक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर ही केवळ पाण्याचा स्रोत नसून शेतीच्या स्थैर्याची हमी मानली जाते. त्यामुळे रखडलेल्या विहिरींची कामे पूर्ण झाल्यास हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळून उत्पादनवाढीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे..सिंचन क्षमतेत वाढीची अपेक्षारखडलेल्या ११० सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाल्यास नागपूर विभागातील कोरडवाहू शेतीला मोठा आधार मिळणार आहे. पावसाच्या अनिश्चिततेवर मात करत वर्षभर पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून भाजीपाला, फळबागा आणि नगदी पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.