
Parbhani Water News : गेल्या महिनाभरात परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्यात ११ टक्के आणि मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यामध्ये १५ टक्के घट झाली आहे.
बेसुमार पाणीउपसा सुरू आहे. त्यातच तापमानात वाढ झाली असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.
गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ११.१७४ दलघमी (२६ टक्के) पाणीसाठा होता. केहाळ (ता. जिंतूर) येथील लघू तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पांमध्ये ३७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
महिनाभरापूर्वी ता. २३ फेब्रुवारी रोजी लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ३७ टक्के आणि मध्यम प्रकल्पांत सरासरी ६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.
गुरुवारी (ता. २३) जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील २२ पैकी राणीसावरगाव (ता. गंगाखेड) या १ लघू प्रकल्पात ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.
एकूण ८ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण १२ लघू तलावांमध्ये ० ते २५ टक्के पाणीसाठा आहे.
गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४६ टक्के पाणीसाठा होता.
गतवर्षी (२०२१-२२) या कालावधीत २२ लघू तलावांमध्ये सरासरी १९.३४१ दलघमी (४६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी २४.११४ दलघमी (४६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.