Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाईसाठी १० कोटींचा आराखडा तयार

Water Shortage : जिल्हा प्रशासन ‘लर्ट मोड’वर असून, ५९२ ठिकाणी उपाययोजना करण्यास सुमारे ९ कोटी ९० लाख ७६ हजारांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Jalgaon News : जिल्ह्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे सुमारे ५९२ गावांत पाणीटंचाईच्या झळा जाणवणार आहेत. जिल्हा प्रशासन ‘लर्ट मोड’वर असून, ५९२ ठिकाणी उपाययोजना करण्यास सुमारे ९ कोटी ९० लाख ७६ हजारांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे.

सद्यःस्थितीत १२ गावांत १३ टँकर सुरू आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राह्मण शेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती या गावांचा समावेश आहे.

दरवर्षी सात जूनला सुरू होणारा पाऊस जूनच्या अखेरीस उशिराने सुरू झाला. एक महिना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. जुलैमध्ये चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली. सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले.

Water Scarcity
Water Scarcity : पाणीटंचाईवर उपाययोजना सुरू

पण उत्पादनात कमालीची घट झाली. बागायती कापसाचे उत्पादन आले. मात्र कोरडवाहू कापसाचे उत्पादन घटले. सप्टेंबर, ऑक्टोबरमधील पावसाने हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणीसाठा झाला. हतनूर ९० टक्के, तर वाघूर शंभर टक्के भरले.

Water Scarcity
Water Scarcity : पाणीसाठा ४१ टक्क्यांवर; ४२ लघू-मध्यम प्रकल्प कोरडे

त्यामुळे भुसावळ परिसरातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर, जळगाव तालुक्यातील पाणीटंचाई मिटण्यास मदत झाली. असे असले तरी चाळीसगाव तालुक्यात कमी पाऊस झाल्याने हा तालुका दुष्काळी जाहीर झाला. इतर अनेक तालुक्यांत कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत.

पाणीटंचाईचे तीन टप्पे

जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईचे तीन टप्पे केले आहेत :

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्ह्यातील ४७ गावात पाणीटंचाई जाणवणार

पहिल्या टप्प्यासाठी ४७ ठिकाणी उपाययोजना. त्यासाठी २ कोटी २६ लाख ६० हजारांचा आराखडा

जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये टंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात १४९ गावात पाणीटंचाई जाणवणार

दुसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांसाठी २ कोटी ४३ लाख २ हजारांचा आराखडा

एप्रिल ते जून २०२४ मधील तिसऱ्या टप्प्यात ३९६ गावांत पाणीटंचाईच जाणवणार

तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांसाठी ५ कोटी २० लाख ९४ हजारांचा आराखडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com