
चिखलदरा, अमरावती : मेळघाटातील (Melghat) धारणी व चिखलदरा तालुक्यांतील २४ गावांमध्ये स्वातंत्र्यापासून अजूनही वीज पोहोचली नव्हती. या भागातील आदिवासी बांधव ७५ वर्षे काळोखातच होते. मात्र आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांच्या प्रयत्नाने या गावांत आता वीज पोहोचणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री यांनी मेळघाटातील वीजसमस्या तातडीने निकाली काढणार असल्याचे आश्वासन आमदार पटेल यांना दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आले होते. यादरम्यान आमदार राजकुमार पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून संबंधित समस्येचे निवेदन दिले आहे. या २४ गावांचा प्रस्ताव शासनाकडे पडून असून काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचे आमदार पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले. वीज नसलेल्या २४ गावांमध्ये माखला, भवई, पिपल्या, खामदा, नवलगाव, मारिता, टेम्बरू, किनी खेडा, रायपूर, चोपन, रिटायखेडा, कोपमार, सावलीखेडा, रक्षा, चूणखडी, कुंड, माडी झडप, रंगूबेली, खडीमल, सुमीता, बोराट्या खेडा, धोकडा, बिच्छू खेडा व खुटीदा इत्यादी गावांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यांना मेळघाटातील या २४ गावांमध्ये वीज नसल्याचे सांगण्यात आले. या २४ गावांच्या विजेच्या कामात सर्वांत मोठा अडथळा वनविभागाचा आहे. मात्र प्रशासनाने तत्काळ वनविभागाची परवानगी घेतली तर काम लवकरच सुरू होईल, असेही सुचविण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.