Agri Entrepreneurship: महानगरी मुंबई शहराच्या गजबजाटात अडकून अनेक जण मन मारून धावपळीमध्ये आयुष्य काढत राहतात. मात्र काही जण स्वतःच्या मनाचा आवाज ऐकून धाडसाने वेगळी वाट निवडतात. जन्माने, शिक्षणाने मुंबईकर असूनही गौरी दिलीप परब या महिलेने आपल्या मूळ गावी तिथवली (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) जाण्याचा निर्णय घेतला. येथे वेगळ्या लेमनग्रास पिकाची लागवड केली. तेवढ्याच न थांबता त्यावर प्रकिया करत विविध दर्जेदार उत्पादनांची निर्मिती केली. या उत्पादनांना देशपरदेशात बाजारपेठ मिळविल्याने त्यांच्या सुगंधी शेतीचा लौकिक सर्वदूर पसरला आहे. .आई-वडील मुंबईत नोकरीला असल्यामुळे गौरी श्रीकृष्ण माईणकर यांचा जन्मच मुंबईत झाला. बालपण, शिक्षणही मुंबईतच झाले. केवळ शाळांना सुट्ट्या पडल्यावर येण्याइतपत तिथवली या मूळ गावांची त्यांची संबंध होता. अभ्यासात हुशार असल्याने प्रत्येक परीक्षेत चांगले गुण मिळवत त्यांनी बारावीनंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केले. त्यातही उत्तम ग्रेड मिळाल्याने मुंबईतील एका नामांकित कंपनीत सहज नोकरीही मिळाली. २०१२ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या दिलीप परब यांच्याशी गौरीचा विवाह झाला. उत्तम नोकरी, चांगला पगार, सुरक्षित करिअर, शहरातील सर्व सोईसुविधा इतके सारे चांगले असूनही त्यांच्या मनाला त्यात पोकळपण जाणवत होते..Women Farmer Success: सेंद्रिय शेती सोबतच उभारले महिलांचे संघटन.गावाची ओढमुंबईच्या काँक्रीटने भरलेल्या जंगलात राहण्यापेक्षा त्यांना गावाकडची हिरवळ, मातीचा सुगंध आणि निसर्गाची शांतता खुणावत होती. बालपणीच्या आठवणी, गावातील एकमेकांना जपणारी माणुसकी आणि साधे समाधानी जीवन मनात रुंजी घालत होते. पहिल्यापासूनच परब दांपत्यांच्या मनात असलेली सामाजिक बांधिलकीही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याने शहराप्रमाणे खेड्यातल्या मुलांनाही संगणक ज्ञान देण्याच्या उद्देशाने ‘युवा लक्ष्य’ ही संस्था स्थापन केली. संस्थेच्या कामासाठी गावी फेऱ्या सुरू झाल्या. प्रत्येक भेटीत गावाकडची माणसे, निसर्गाशी नाते अधिक घट्ट होत गेले..गावी स्थायिक होण्याचा धाडसी निर्णयमुंबईतील स्थिरस्थावर असतानाच परब दांपत्याने गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तिथवली हे गौरीचे माहेर, तर दहीबाव (ता. देवगड) हे पतीचे गाव आहे. तिथवली गावात बारमाही वाहणाऱ्या शुक नदीकाठी दहा एकर जमीन होती. येथेच शेती करता येईल, असा उद्देश ठेवत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. शेतीत पिके कोणती घ्यायची, याबद्दल भरपूर विचारमंथन झाले. या भागात बहुतेक जण पारंपरिक भात, नाचणी, ऊस, आंबा, काजू, फणस, आवळा, केळी अशी पिकांची शेती करतात. परंतु गौरी यांना मळलेल्या वाटेने जाण्यात अजिबात स्वारस्य नव्हते. काही तरी वेगळा प्रयोग करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता..लेमनग्रास लागवडीचा श्रीगणेशाहवामान बदल आणि वन्यप्राण्यांचा उपद्रव हे सध्या कोकणातील शेतीसमोरची सर्वांत मोठी समस्या बनली आहे. त्यावर मात करणाऱ्या पिकांचा पर्याय शोधत असताना लेमनग्रास या सुगंधी वनस्पतीच्या लागवडीचा पर्याय समोर आला. त्याचे वन्यप्राणी नुकसान करीत नाही की कीड-रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. गवतवर्गीय असल्यामुळे बदलत्या वातावरणातही तग धरण्याची या पिकामध्ये मोठी क्षमता असल्याचे सारे तज्ज्ञ सांगत होते. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही लेमनग्रास लागवड केल्याचे ऐकिवातही नव्हते. .या पिकाविषयी संपूर्ण माहिती इंटरनेटवरून मिळवत गेल्या. वेगवेगळ्या पद्धतींचा विचार व विश्लेषण करत पहिल्या टप्प्यात दोन एकरमध्ये लागवडीचा निर्णय घेतला. जमिनीची मशागत केल्यानंतर लेंडीखत, शेणखतांचा भरपूर वापर केला. झारखंड येथून प्रति कंद २ रुपये ५० हजार कंदांची खरेदी करून २०२१ मध्ये लागवड केली. शेतामध्ये काम, व्यवस्थापन करताना वाढणारा एकेक कोंब त्यांना अधिक आनंदी करत होता. उत्पादन सुरू झाले. कंदांची संख्या वाढत गेली, तसे त्यांनी हळूहळू क्षेत्र वाढवत १० एकरांवर नेले. कंद पुन्हा खरेदी करण्याची आवश्यकताच भासली नाही. या शेताला त्यांनी नाव दिले आहे - सुगंधाचं शेत. सुगंधाच्या शेतात तुमचे स्वागत आहे असा फलक प्रत्येकाला त्यांच्या शेतीकडे आकर्षित केल्याशिवाय राहत नाही..Farm Pre-Cultivation: शेतांची पूर्वमशागत सुरू.प्रकिया उद्योगाची उभारणीकेवळ लेमनग्रासची लागवड करतानाच केवळ विक्री एवढ्यावर गौरी थांबणार नव्हत्या. त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच लेमनग्रासपासून सुगंधी तेल आणि अन्य मूल्यवर्धित उत्पादनांची व्यावसायिक निर्मितीचा उद्देश होता. बॅंकेकडून ४५ लाखांचे कर्ज घेत शेड उभारले. त्यात स्टीम डिस्टिलेशन प्रकिया युनिट बसवत प्रक्रियेला प्रारंभ केला. तिथवलीसारख्या ग्रामीण भागात नवे पर्व सुरू झाले. लेमनग्रासपासून सुगंधी तेल, सुगंधी साबण, एअर फ्रेशनर, क्लिनर, कार क्लीनर अशा उत्पादनांची निर्मिती सुरू केली. अलीकडचे केवळ कोकणाकरिता ‘सुगंधा सुरक्षा’ हे नवे उत्पादनही तयार केले. या सगळ्या प्रक्रियेत त्यांनी गुणवत्ता आणि स्वच्छतेवर विशेष भर दिला. याशिवाय जनावरांना बांधण्यासाठी उत्तम दर्जाची दावणही त्या गवतापासून तयार करतात. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक अगरबत्ती व्यावसायिक सुगंधासाठी सौ. परब यांच्याकडून लेमनग्रास व तेले खरेदी करतात..सोशल मीडियाद्वारे मार्केटिंगगौरी ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या गौरी यांना सोशल मीडिया व त्यामागील क्लृप्त्या चांगल्याच माहीत आहेत. पूर्वी मुंबईत गारमेंट उद्योगात तयार होणाऱ्या पैठणीच्या मार्केटिंगकरिता सोशल मिडीयाचा वापर केला होताच. तो मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या कामी आला. विविध समाजमाध्यमांवरून सातत्याने आकर्षक पोस्ट, फिड्स तयार करत त्यांनी आपला ग्राहकवर्ग वाढविला. त्यांनी सुगंधी उत्पादनांच्या मार्केटिंगकरिता ‘हाउस ऑफ सुगंधा डॉट कॉम’ ही वेबसाइट तयार केली आहे..त्यावरून त्यांनी सर्व उत्पादने देशविदेशापर्यंत पोहोचली आहे. त्याच प्रमाणे विक्रीची विविध ऑनलाइन व्यासपीठांवरून त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी असते. दर्जेदार उत्पादन, आकर्षक पॅकिंग आणि ग्राहकांशी थेट संवादामुळे त्यांना मार्केटिंगमध्ये कधीच अडचण आली नाही. शहरातून गावाकडे येऊन शेती आणि प्रक्रिया उद्योगात यश मिळवणे, ही सोपी गोष्ट नाही. पण योग्य नियोजन, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून गौरी यांनी स्वतःच नव्या पिकात यशाचा मार्ग तयार केला आहे. आज त्यांच्या ‘सुगंधाच्या शेतातून दरवळणारा सुगंध हा केवळ लेमनग्रासचा नाही, तर त्यांच्या कष्टांचा, जिद्दीचा आणि स्वप्नपूर्तीचा आहे..उत्पादन प्रक्रिया व थोडक्यात ताळेबंदलेमनग्रास लागवडीमध्ये सुरुवातीच्या पाच वर्षामध्ये एकरी ५० हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर दरवर्षी केवळ १० हजार रुपये खर्च येतो.दहा एकरमधून वार्षिक १६० टन लेमनग्रास उत्पादन मिळते.डिस्टिलेशन खर्च प्रतिएकर ५५ हजार रुपये येतो.प्रति टन लेमनग्रासपासून हवामानानुसार पाच ते आठ लिटर सुगंधी तेलाचे उत्पादन मिळते.उत्पादीत तेलापैकी निम्म्या तेलाची मागणीनुसार ग्राहकांना विक्री केली जाते. त्याला प्रतिलिटर ८०० ते १२०० रुपये दर मिळतो..उर्वरित निम्म्या तेलापासून सुगंधा साबण, एअर फ्रेशनर, कार फ्रेशनर, क्लीनर अशा मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जाते.सुगंधा साबण १५० रुपये, एअर फ्रेशनर ३०० रुपये प्रति लिटर, कार फ्रेशनर सहाशे रुपये प्रति लिटर, क्लीनर ३०० रुपये प्रतिलिटर या प्रमाणे विकले जाते.एकरी एकूण उत्पन्न - १.५ लाख रुपये.वार्षिक उलाढाल १५ लाखांपर्यंत होते..एकूण खर्च ६.५ लाख रुपये.नफा - ८.५ लाख रुपये.केवळ सुगंधी तेलाची विक्री करण्यापेक्षा सुगंधी उत्पादनाची निर्मिती व विक्रीतून अधिक नफामिळतो.या शेती आणि प्रक्रिया उद्योगातून १० ते १५ स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.- गौरी परब, ८३६९८८२०३६ .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.