Nutrition Garden Initiative in Jalna: जालना जिल्ह्यातील खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने आरोग्यदायी आहाराचे महत्त्व ओळखून पोषण बागेची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला तीन गावांतून आरोग्यासाठी सुरू झालेला हा उपक्रम आता चळवळ बनू पाहत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या चार तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात बारा गावांतील महिला आता सातत्याने दरवर्षी पोषण बाग उपक्रम राबवून कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच अर्थार्जनही करत आहे. या माध्यमातून पालेभाज्यांच्या देशी वाणांचे संवर्धन होत आहे..खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्यदायी परसबाग उपक्रमाबाबत नियोजन सुरू झाले. २०१५ मध्ये कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. व्ही. सोनूने यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने सकस फळे, पालेभाजी, वेलवर्गीय, कंदवर्गीय भाज्याचे उत्पादन घेता येईल का, त्यासाठी बियाणे कसे उपलब्ध करून देता येईल यावर विचार मंथन होऊन काही शेतकऱ्यांना तसा प्रयोग करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांना देशी वाणांचा पुरवठा देखील करण्यात आला..कृषी विज्ञान केंद्राचे हे प्रयत्न सुरू असतानाच २०१८ मध्ये ‘युनिसेफ’च्या माध्यमातून ‘फार्मिंग सिस्टीम फॉर न्यूट्रिशन’ हा प्रकल्प सुरू झाला. यामध्ये वानडगाव, कचरेवाडी, हडप, सावरगाव येथील २०० महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. कुटुंबाच्या आरोग्यासाठी पोषण घटकांचे महत्त्व ओळखून विविध प्रकारच्या भाज्यांची निवड करून परसबाग तयार करण्यात आली. त्यामध्ये स्वतः कृषी विज्ञान केंद्राने काही आर्थिक आधार दिला..Model Village: महमदपूर - ‘मॉडेल व्हिलेज’च्या वाटेवर.बियाणे किट उपलब्धताप्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागणारे आणि विविध भाज्यांच्या बियाण्यांचे अर्धा ते एक गुंठ्याला पुरेल एवढे बियाणे कीट तयार करण्यात आले. त्यासाठी देशी वाणांचे संवर्धन करणाऱ्या काही घटकांसह नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनतर्फे देशी बियाणे उपलब्धतेसाठी मदत घेण्यात आली. त्यातून वांगे, टोमॅटो, मिरची, भेंडी, चवळी, पालक, मेथी, शेपू, आंबटचुका, कोथंबीर, कारले, गिलके, भोपळा, वाल, गाजर आणि बीट अशा सोळा प्रकारच्या भाज्यांचे बियाणे किट तयार केले. जानेवारी आणि जून-जुलै दरम्यान या बियाणे किट बनविण्याचे काम केले जाते. शेतकऱ्यांना लागवडीपासून पीक व्यवस्थापनाची माहिती देणारे पत्रक तसेच शेवगा, लिंबू, पेरू, आंबा, जांभूळ, पपई, सीताफळ आदींची प्रत्येकी दोन रोपे दिली जातात, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान तज्ज्ञ डॉ. संगीता कऱ्हाळे यांनी दिली..गंगामा मॉडेलहे कमी जागेतील वर्तुळाकार पोषण बाग मॉडेल आहे. एक हजार चौरस फूट जागेत पाच सदस्यांच्या कुटुंबासाठी विविध पिकांचे नियोजन करता येते. या मॉडेलची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे एकमेकांच्या आत असलेली वर्तुळे आणि सात समान भागांमध्ये विभागलेले मार्ग..मध्यभागी एक खुंटी लावून दोरीच्या साह्याने वर्तुळे आखली जातात. सविस्तर पद्धतीत साधारण १५ फूट त्रिज्येचे बाह्य वर्तुळ आखले जाते आणि त्यामध्ये अनुक्रमे १०.५, ९, ६, ४.५ आणि ३ फूट अंतरावर वर्तुळे आखली जातात. बाहेरील भाग सात समान विभागांत विभागला जातो. प्रत्येक विभागामध्ये साधारण १.५ फूट रुंदीचे मार्ग ठेवले जातात. या मॉडेलमध्ये सात मार्ग आहेत. प्रत्येक दिवशी एका मार्गातून बागेत प्रवेश करून पाणी देणे, तयार भाजीपाला तोडणे,निरीक्षण करणे,आवश्यक मशागत करणे असे नियोजन करता येते..सात दिवसांत सातही भागांची फेरफटका पूर्ण होतो आणि पुन्हा पहिल्या भागाकडे येईपर्यंत तेथील उत्पादन उपलब्ध होण्याचे उद्दिष्ट असते. प्रत्येक दिवसासाठी भाज्यांचे तीनही प्रकार खाण्यात यावे हा उद्देश आहे. पालेभाजी, फळभाजी आणि कंद भाजी पिकांची लागवड उंची, सूर्यप्रकाशाची गरज, कालावधी आणि वाढीची पद्धत लक्षात घेऊन केली जाते. आतील वर्तुळात कमी उंच तसेच लवकर उत्पादन देणारी पिके, मधल्या वर्तुळात फळभाज्या व इतर भाज्या, बाहेरील भागात जास्त जागा घेणारी किंवा पसरणारी पिके, बागेच्या मध्यभागी किंवा बाहेरील कडेला फळझाडे घेता येतात. मात्र झाडांमुळे आतील पिकांवर जास्त सावली पडणार याची दक्षता घेतली जाते..केवळ तोंडी प्रबोधनापुरते मर्यादित न राहता २०२१ मध्ये खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर पोषण बागेचे हे ‘गंगामा मॉडेल’ उभे केले. जालना जिल्हा तसेच विविध जिल्ह्यातील सुमारे सात हजारांवर शेतकऱ्यांनी या रचनात्मक पोषण बागेला भेट देऊन स्वतःच्या घराजवळ पोषक बागांची निर्मिती केली आहे..वाढती मागणीआहारतज्ज्ञांच्या मते एका प्रौढ व्यक्तिला समतोल आहारात दररोज ३०० ग्रॅम भाज्या, १०० ग्रॅम फळांची दैनंदिन गरज असते. बाजारातून बियाणे आणताना ते देशी व संवर्धन करता येईल असे असावे, ही मोठी अडचण ‘बियाणे किट’ मुळे दूर झाली. कृषी विज्ञान केंद्राने २०२३ पासून बियाणे किट तयार करून पुरवठा करण्याचे काम सुरू केले. दरवर्षी सुमारे १००० बियाणे किट शेतकरी, स्वयंसेवी संस्था, कृषी विज्ञान केंद्र आदींना पुरवठा केला जातो. जिल्ह्यात पोषण बाग विस्तारण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये सातत्य राहण्यासाठी स्पर्धा घेऊन त्यामधून पाच महिलांना पुरस्कृत करण्याचे धोरण कृषी विज्ञान केंद्राने अवलंबिले आहे. .Agriculture Success Story: एकत्रित जपलेली कुटुंबपद्धती, यशस्वी एकात्मिक शेती .बियाण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांची पोषणबाग तसेच एनएससी सोबतच कचरेवाडी, वानडगाव येथील भाजीपाला पोषण बाग करणाऱ्या महिलांची मोठी मदत होते. सांगली जिल्ह्यात २००० बियाणे किट महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिल्या गेल्या आहेत. याशिवाय, पुणे येथील यशदा मार्फत, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, लातूर, जळगाव,बीड जिल्ह्यातील शेतकरी तसेच जळगाव जिल्ह्यातील पाल कृषी विज्ञान केंद्र, अंबड तालुक्यात वॉटर संस्थेमार्फत बियाणे किट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहेत. .कृषी विज्ञान केंद्राने कार्यक्षेत्रातील जालना, परतुर, घनसावंगी, मंठा या तालुक्यात शेतकऱ्यांच्या सोईनुसार पोषण बागा विस्तारण्याचे काम केले आहे. सुरुवातीला वानडगाव, कचरेवाडी, हडप, सावरगाव येथून सुरू झालेले पोषण बाग उभारणीचे काम आता दैठणा, मानेगाव, कुंबेफळ, शिरसवाडी, रामनगर,मोसा, कटाळा, खणेपुरी, भाटेपुरी या गावात पसरले आहे, अशी माहिती डॉ. संगीता कऱ्हाळे यांनी दिली..पोषण बागेचे महत्त्वकुटुंबाला वर्षभर ताज्या व पौष्टिक भाज्यांची उपलब्धता. जैवविविधतेचे संवर्धन.कुपोषण व सूक्ष्म अन्नघटकांची कमतरता कमी होते.रसायन अवशेषमुक्त व सुरक्षित अन्न मिळते.घरखर्चात बचत. अतिरिक्त उत्पादनातून उत्पन्न मिळू शकते..जागेची निवडघराजवळ तसेच पाण्याची सुविधा असलेली आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी जागा असावी. चांगला निचरा होणारी जमीन असावी.जमीन नांगरून भुसभुशीत करावी. चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. उंच वाफे तयार करावेत..पिकांची निवडपालेभाज्या : पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, चुका, अंबाडीफळभाज्या : वांगी, भेंडी, टोमॅटो, मिरचीवेलवर्गीय : कारले, दोडका, घेवडा, भोपळा, वालकंदभाज्या : गाजर, बीट, मुळाशेंगवर्गीय : गवार, चवळी, शेवगालागवडहंगामानुसार बियाण्यांची पेरणी.योग्य अंतरावर लागवड.मिश्रपीक, आंतरपीक पद्धतीचा अवलंब..पाणी व्यवस्थापननियमित व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.ठिबक किंवा झारीद्वारे सिंचन करावे.कीड, रोग व्यवस्थापननीम अर्क, दशपर्णी अर्क, जिवामृत, गोमूत्र यांसारख्या जैविक उपायांचा वापर करावा.रोगग्रस्त झाडे काढून टाकावीत. बागेत स्वच्छता राखावी..खत व्यवस्थापनसेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनासाठी बागेत शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खताचा वापर करावा.- डॉ. संगीता कऱ्हाळे- गायकवाड ९०२८२५४९५९(गृहविज्ञान (विषय तज्ज्ञ), कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.