सांगली जिल्ह्यात अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी फूलशेतीकडे वळले आहेत.
सांगली जिल्ह्यात अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी फूलशेतीकडे वळले आहेत.

फूलशेतीतून मिळाली नवी दिशा

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्य़ात द्राक्ष, डाळिंब या पिकांबरोबरच फुलांचा गंध दरवळू लागला आहे. त्यातून आर्थिक बदल घडू लागला आहे. मोगरा, निशिगंध, झेंडू आदींच्या पीक पद्धतीतून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत आहे.

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्य़ात द्राक्ष, डाळिंब या पिकांबरोबरच फुलांचा गंध दरवळू लागला आहे. त्यातून आर्थिक बदल घडू लागला आहे. मोगरा, निशिगंध, झेंडू आदींच्या पीक पद्धतीतून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत आहे.   सांगली जिल्हा ऊस, डाळिंब, द्राक्ष, भात आणि हळदीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात ५५० हेक्टर क्षेत्रांवर आता फूलशेतीही होऊ लागली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे अवर्षण तालुके. योजनांचं पाणी आलं त्यामुळे डाळिंब, द्राक्ष शेती वाढली. आज याच तालुक्यात लालचुटूक डाळिंबे व रसाळ द्राक्षे पिकू लागली. येळवी (ता. जत) येथील रविकिरण पवार यांनी ताजे किंवा अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने काही पर्यायी पिकांचा अभ्यास सुरू केला. त्यातून मोगऱ्याचे पीक पुढे आले. मुंबईची बाजारपेठ त्यासाठी उपलब्ध आहे. सरासरी २०० ते ३५० रुपये प्रति दहा किलो दराने विक्री होते. शेतकरी गटाची स्थापना गावातील शेतकऱ्यांनी पवार यांच्याकडून प्रेरणा घेत श्रीराज भाजीपाला व मोगरा उत्पादक गटाची स्थापना केली. गटात २२ शेतकरी. कोरडवाहू, माळरान शेती. शाश्वत उत्पन्नासाठी त्यांनीही मोगरा लागवडीचा पर्याय निवडला. आज गटाच्या माध्यमातून सुमारे १० एकरांवर मोगऱ्याची शेती फुलली आहे. गावासह पंचक्रोशीतील सुमारे ५० हून अधिक महिलांच्या हाताला काम मिळाले. बळीराजा आणि मजूर अशी दोन्ही घरं चालू लागली. फुलांची विक्री, मुंबई, पुणे यासह मिरज येथील फूल मार्केटमध्ये विक्री होते. एकरी ५० हजारांवर ते काहीवेळा लाख रुपयांची उलाढाल होते. मोगरा काढणीनंतर दर्जा टिकावा यासाठी प्रिकुलिंग युनिटमध्ये ठेऊन पॅकिंग करून ‘मार्केटिंग’ केले जाते. बहुतांश शेतकरी एकमेकांच्या साह्याने बदल स्वीकारत असल्याचे दिसते आहे. भाजीपाला शेतीची जोड गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने वाहतूक व्यवस्था बंद असल्याने फुलांची विक्री करता आली नाही. मग भाजीपाल्याची जोड दिली. थेट विक्रीचा नवा अनुभव त्यातून मिळाला. हाच अनुभव भविष्यात मोठा दुवा ठरणार आहे. विक्रीबरोबर गावातील आर्थिक दृष्ट्य़ा गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना मोफत भाजीपाला देण्याचे कामही या शेतकऱ्यांनी केले. फूलशेतीचा ध्यास कवेठमहांकाळ तालुक्यात फुलशेतीखाली २९ हेक्टर क्षेत्र आहे. विजय इंगवले आणि त्यांचा मित्रपरिवार फूलशेतीसाठी पुढे आले आहेत. गुलाब, निशिगंध, गलांडा यासारख्या फुलांची शेती ते करू लागले आहे. फुलांना बारमाही मागणी असते. मिरज तालुक्याचा पश्चिम भाग अनेक वर्षांपासून भाजीपाला आणि फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. तुंग, कसबेडिग्रज, सावळवाडी, कवठेपिरान या परिसरात झेंडू सह निशिगंधाचा सुगंध मोठ्या प्रमाणात दरवळतो. कवठेपिरान मधील शेतकरी अकबर मुजावर सांगतात की आमच्या भागात ऊस प्रामुख्याने घेतात. परिसरात आणि मित्राकडील फूलशेती पाहून ती करण्याचा निर्धार केला. लग्नमंडपाची सजावट, जयंती सह विविध कार्यक्रमांची सजावट करण्यास सुरुवात केली. यातून उत्पन्नात ४० ते ५० टक्के वाढ झाली. बाजारपेठेतील मागणी ओळखून झेंडू, ॲस्टर , गलांडा फुलांची लागवड केली. काहीवेळा बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून २० ते ८० रुपये प्रति किलो दराने खरेदी केली जाते. जिल्ह्यात अशा बदलत्या पीक पद्धतीतून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com